Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

| Updated on: Dec 19, 2021 | 10:07 AM

गेल्या महिन्यात एकाच आठवड्यात पडलेले तीन खून, त्यानंतरच्या तीन दरोड्यानंतर आता नाशिकमध्ये एका महिला वकिलाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याने घेरून पेट्रोलहल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे.

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा...गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us on

नाशिकः पर्यटननगरी, उद्योगनगरी, अध्यात्मनगरी अशी ओळख असणाऱ्या नाशिकची झपाट्याने सुरू असलेली क्राईमनगरीकडील वाटचाल थांबताना दिसत नाही. अंधेर नगरी चौपट राजा, अशी शहराची सध्या तरी अवस्था झालेली दिसत आहे. कारण गेल्या महिन्यात एकाच आठवड्यात पडलेले तीन खून, त्यानंतरच्या तीन दरोड्यानंतर आता नाशिकमध्ये एका महिला वकिलाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याने घेरून पेट्रोलहल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. नवीन सीबीएस ठक्ठर बाजारात घडलेल्या या प्रकाराने शहरवासीय पुन्हा एकदा हादरून गेले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

अशी घडली घटना

नाशिकमधील ठक्कर बाजार भागात अॅड. अलका श्रीकांत मोरे-पाटील (वय 40, रा. राजीवनगर) यांचे ऑफिस आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपले काम संपवले. त्या घरी जायला बाहेर पडल्या. तेव्हा त्यांना अचानक आठ ते दहा जणांच्या टोळक्याने घेरले. त्यांच्याशी सुरुवातीला झटापट केली. यात त्या खाली पडल्या. तेव्हा टोळक्याने त्यांच्या अंगावर पेट्रोलसदृश्य पदार्थ टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यासोबत प्रशिक्षार्थी म्हणून काम करणाऱ्या सहकारी जयश्री तुलसीदार महाले या त्यांच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी आणि इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला. तेव्हा या टोळक्याने अॅड. अलका मोरे यांना बघून घेण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत पोबारा केला. मात्र, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

का केला हल्ला?

अॅड. अलका मोरे या छावा जनक्रांती संघटनेचे काम पाहतात. त्यांनी तळावाडे येथील ग्रामपंचायतीतील गैरकारभाराचे बिंग फोडले. त्यामुळे संबंधितांनी आपल्यावर हल्ला केला. धमकी दिली, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या प्रकाराने परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. नाशिकमध्ये गेल्या महिन्यात पडलेले तीन खून, तीन दरोडे आणि त्यानंतर आता झालेला हा प्रकार. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलीस इतके थंड कसे?

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. मात्र, पोलिसांचे म्हणावे तितके लक्ष दिसत नाही. पोलीस आयुक्त फक्त हेल्मटसक्तीची मोहीम राबवताना दिसत आहेत. त्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या अशा गुंडांच्या मुसक्या आवळाव्यात. कोम्बिग ऑपरेशन राबवून नागरिकांची या भीतीतून सुटका करावी. एकीकडे खून आणि दरोडे पडत असताना पोलीस इतके कसे काय थंड राहू शकतात, असा सवाल आता चीडून सर्वसामान्यांच्या ओठी येताना दिसत आहे.

इतर बातम्याः

Nashik | कोविड अनुदानासाठी मदत कक्ष; कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून…

Nashik| कृषी पर्यटन धोरणात शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी; काय आहे पात्रता, कशी कराल नोंदणी, घ्या जाणून..!