Assault Case : कर्जत येथील प्रतीक पवार या तरुणावरील हल्ला प्रकरण, आतापर्यंत 14 आरोपींना अटक

सनी पवार शहरातील अक्काबाई नगर परिसरामध्ये राशीन येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमास जाण्यासाठी थांबले होते. त्या ठिकाणी दहा ते पंधरा युवकांनी हातामध्ये गज, काठ्या, हॉकीची स्टिक, तलवार यांच्या साह्याने हल्ला केला.

Assault Case : कर्जत येथील प्रतीक पवार या तरुणावरील हल्ला प्रकरण, आतापर्यंत 14 आरोपींना अटक
आतापर्यंत 14 आरोपींना अटक
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Aug 07, 2022 | 5:43 PM

अहमदनगर : कर्जत येथील प्रतीक पवार (Prateek Pawar) या तरुणावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आणखी 8 जण ताब्यात घेण्यात आले. काल 6 जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळं आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या 14 झाली आहे. कर्जत शहरात प्रतीक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर हल्ला करण्यात आला. घडलेल्या घटने प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Superintendent of Police Manoj Patil) यांनी ही माहिती दिली. गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला प्रतीकवर हल्ला केला होता. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार (Treatment at a private hospital) सुरू आहेत.

कर्जतमध्ये काही काळ बंद

अहमदनगरला कर्जत शहरात प्रतीक राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत शहरांमध्ये काही वेळ बंद पाळण्यात आला. यावेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सुरुवातीला दोघा जणांना अटक करण्यात आली. आठ जणांवर ॲट्रॉसिटीसह भादवी कलम 307 अन्वये कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अशी घडली घटना

सनी पवार शहरातील अक्काबाई नगर परिसरामध्ये राशीन येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमास जाण्यासाठी थांबले होते. त्या ठिकाणी दहा ते पंधरा युवकांनी हातामध्ये गज, काठ्या, हॉकीची स्टिक, तलवार यांच्या साह्याने हल्ला केला. यामध्ये सनी पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. हा हल्ला का करण्यात आला. याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत चौदा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळं हल्ला करणं या गटाला चांगलंच भोवलं आहे. पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण गंभीरतेनं घेतलं. त्यामुळं आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आपसी मतभेदातून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.