थाटामाटात पठ्ठ्यानं उडवला लग्नाचा बार, मोजून सात दिवसांनंतरही अविवाहित नेमकं काय घडलं?

सध्या अनेक मुलांना मुली मिळत नसल्याचं ऐकायला मिळतं. त्यामुळे मुलासांठी आता फार कठिण झालं आहे. मात्र अशातच धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये लग्न झाल्यावरही एक तरूण अविवाहित राहिला आहे.

थाटामाटात पठ्ठ्यानं उडवला लग्नाचा बार, मोजून सात दिवसांनंतरही अविवाहित नेमकं काय घडलं?
bride and groom
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 10, 2023 | 9:22 PM

नवी दिल्ली : प्रत्येकासाठी आयुष्यात लग्न हे स्पेशल असतं, यासाठी आपण जोडीदाराची निवड करतान वेळ घेतो. एकदा सर्व काही जुळून आलं की लग्नाची तयारी करताना सर्वा घरात उत्साहाचं वातावरण असतं. मात्र सध्या अनेक मुलांना मुली मिळत नसल्याचं ऐकायला मिळतं. त्यामुळे मुलासांठी आता फार कठिण झालं आहे. मात्र अशातच धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये लग्न झाल्यावरही एक तरूण अविवाहित राहिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राजस्थामधील जयपूरमधील विश्वकर्मा नगरमध्ये राहणाऱ्या रामलाल तरूणाचा विवाह खूप दिवसांनी ठरला होता. एका एजंटने रामलालचं लग्न जमवून दिलं होतं. यासाठी त्याने एजंटला 3.50 लाख रूपये दिले होते. पश्चिम बंगालमधील सुष्मितासोबत २३ जूनला त्याचा मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला होता.

लग्न झाल्यावर घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण होतंं, घरातील आनंद फार काही टिकला नाही. कोणीही कल्पना केली नसावी असा प्रकार घडला. आठवडाभर नववधू सुष्मिता घरात सर्वांशी मिळून मिसळून राहू लागली. घरच्यांनाही तिने आपलंस केलं आणि आठवड्यानंतर तिने खरा रंग दाखवला.

1 जून रोजी अचानक ती घरातून पळून गेली तिचा आजपर्यंत पत्ता लागला नाही. घरातून लाखो रुपये किमतीचे दागिने आणि रोकड घेऊन ती फरार झाली होती. सुष्मिता दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 18 लाख रुपये घेऊन गेले होते. रामलाल याला मोठा धक्का बसला त्यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली.

दरम्यान, राजस्थानमधून दरवर्षी अशी 90 प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये नववधू अशा प्रकारे चोरी करून फरार होत आहे. बाजारामध्ये काही टोळ्या सक्रिय असून लग्नाच्या गडबडीमध्ये तुम्ही अशांपासून सावध रहा.