AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस स्टेशनमध्ये महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिस दखल घेत नसल्यामुळे टोकाची भूमिका

पोलिस ठाण्याच्या अंगणात दोन महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जमीन हडपल्याची पोलिस दखल घेत नसल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिस स्टेशनमध्ये महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिस दखल घेत नसल्यामुळे टोकाची भूमिका
islampur police station (1)Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 31, 2023 | 12:56 PM
Share

शंकर देवकुळे, इस्लामपूर : येथील कापूसखेड (Kapuskhed) रस्त्यावरील जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी (Islampur police) दखल घेतली नाही. म्हणून नणंद-भावजयीने पोलिस ठाण्याच्या अंगणात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न (Attempted self-immolation) केल्याची घटना नुकतीच घडली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे अनर्थ टळला असल्याची माहिती मिळाली आहे. दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. पूजा ऋतुराज धुमाळे आणि आरती प्रवीण धुमाळे (३०, मूळ रा. चरण- बांबवडे, ता. शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर आहे. परंतु त्या सध्या कापुसखेड रोड, वीट भट्टीजवळ, इस्लामपूर) येथे राहत आहेत.

अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न

धुमाळे कुटुंबाचे कापूसखेड रस्त्यावर शेत आहे. सध्या या परिसरात प्लॉट पाडून जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार जोमात होत आहेत. बड्या राजकीय कार्यकर्त्यांनी या परिसरात आपली मालमत्ता केली आहे. धुमाळे कुटुंबाच्या या जागेलगत असणाऱ्या एका बड्या कार्यकत्याने त्यांच्या १०९ गुंठे जागेला कुंपण मारण्यासाठी आज सकाळी खांब रोवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी माहिती अथवा त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संतापलेल्या आरती आणि पूजा या दोघींनी पोलिस ठाण्याच्या दारातच आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या दोघींना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर हे शहर मोठं होतं आहे. जशी शहराची प्रगती होत आहे. त्याचबरोबर तिथल्या रस्त्यालगत असलेल्या जमिनीची किंमत सुद्धा मोठी झाली आहे. त्यामुळे जमिनी हडपण्याचा प्रकार सुरु आहे. जमिनी हडप करण्याचे आतापर्यंत अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.