कौटुंबिक कार्यक्रमासाठी घरुन निघाला, वेळ होता म्हणून मित्रांशी बोलत उभा राहिला इतक्यात…

| Updated on: Jan 27, 2023 | 6:13 PM

मयत तरुणांपैकी नितीश कुमार हा एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चालला होता. कार्यक्रमाला थोडा वेळ असल्याने तो रस्त्याच्या कडेला आपल्या अन्य पाच मित्रांशी बोलत उभा होता.

कौटुंबिक कार्यक्रमासाठी घरुन निघाला, वेळ होता म्हणून मित्रांशी बोलत उभा राहिला इतक्यात...
बस आणि कार अपघातात तीन तरुण ठार
Image Credit source: Google
Follow us on

पलामू : झारखंडमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत चार मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना मेदिनीनगर एमएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. आशिष कुमार, विवेक कुमार, नितीश कुमार आणि फिरोज अंसारी अशी अपघातात मयत तरुणांची नावे आहे. जखमींमध्ये स्कॉर्पिओ कार चालकाचाही समावेश आहे. स्कॉर्पिओ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

सहा मित्र रस्त्याच्या कडेला उभे होते

नौदिहा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिशूनपूर भांगिया मोरजवळ ही घटना घडली. मयत तरुणांपैकी नितीश कुमार हा एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चालला होता. कार्यक्रमाला थोडा वेळ असल्याने तो रस्त्याच्या कडेला आपल्या अन्य पाच मित्रांशी बोलत उभा होता.

दारुच्या नशेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले

याचदरम्यान एक भरधाव स्कॉर्पिओने सहा मित्रांना चिरडले. दारुच्या नशेत असलेल्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात चार मित्र जागीच ठार झाले तर अन्य दोन मित्रांसह गाडी चालक जखमी झाला.

हे सुद्धा वाचा

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली आहे. कार चालकाची ओळख पोलिसांनी पटवली आहे.