AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत सुनावणीनंतर तुरुंगात परतताना पोलिसांची गाडी उलटली, कैद्याचा मृत्यू

नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात कैदी श्रावण बावणे याचा जागीच मृत्यू झाला. ( Wardha Police Car Accident)

मुंबईत सुनावणीनंतर तुरुंगात परतताना पोलिसांची गाडी उलटली, कैद्याचा मृत्यू
मुंबईहून भंडाऱ्याला परतताना पोलिसांच्या वाहनाला अपघात
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 06, 2021 | 7:29 AM
Share

वर्धा : मुंबईत न्यायालयातील हजेरीनंतर भंडारा येथे परत जात असताना पोलिसांच्या वाहनाला टायर फुटून अपघात झाला. यामध्ये भंडारा कारागृहातील कैद्याचा मृत्यू झाला, तर वाहन चालकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. हा अपघात नागपूर ते अमरावती महामार्गावरील कारंजा (घाडगे) जवळील राजणी फाट्यावर घडला. (Wardha Police Car Accident kills Prisoner Returning From Mumbai Court Hearing)

नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर अपघात

भंडारा कारागृहातील 65 वर्षीय कैदी श्रावण बावणे (रा. नागपूर) याला मुंबई येथील न्यायालयात हजेरीसाठी नेण्यात आले होते. काल न्यायालयात पेशीनंतर परत भंडारा येथे आणत असताना नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. राजणी शिवारात अचानक पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.

तीन वेळा पटून पोलिसांची गाडी विरुद्ध दिशेला

अपघातात वाहनाने रस्ता ओलांडून जवळपास तीन चार पलट्या घेतल्या. त्यानंतर विरुद्ध रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहिले. या अपघातात कैदी श्रावण बावणे याचा जागीच मृत्यू झाला. तर तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. अभिषेक घोडमारे, सावन जाधव, शकील शेख, चालक राजेश्वर सपाटे हे कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांच्या गाडीला अपघाताची वर्ध्यात पुनरावृत्ती

दरम्यान, आर्वी येथून विरुळ मार्गे वर्ध्यात साप्ताहिक परेडसाठी जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी (जून 2019) घडली होती. या घटनेत सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

वर्ध्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाड्याच्या फांद्या पडल्या होत्या. आर्वी येथून विरुळ मार्गे वर्ध्यात साप्ताहिक परेडसाठी जात असताना रस्त्यावर झाडाची एक फांदी कोसळली होती. या फांदीमुळे गाडीला अपघात होऊ नये या हेतूने चालकाने गाडी थोडी वळवली. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली होती.

संबंधित बातम्या :

झाडाच्या फांदीमुळे पोलिसांच्या गाडीला अपघात, 6 पोलीस जखमी

(Wardha Police Car Accident kills Prisoner Returning From Mumbai Court Hearing)

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?