सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पतीची हत्या, बॉयफ्रेंडसोबत राहण्याची होती इच्छा

एका महिलेने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जे काही केले ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.. फुटला घाम... आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पतीची हत्या, बॉयफ्रेंडसोबत राहण्याची होती इच्छा
Husband wife fight
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 10, 2025 | 4:43 PM

मेरठच्या सौरभ हत्याकांडासारखाच एक भयानक घटना समोर आली आहे. एका महिलेने सरकारी नोकरी मिळण्याच्या मोहामध्ये पतीची हत्या केली आहे. पतीच्या हत्येचा कट रचण्यासाठी तिच्या बॉयफ्रेंडनने मदत केली. पण तिने ज्या प्रकारे गे सर्व काही केलं ते पाहून सर्वांना धक्काच बसला.

पतीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात त्या व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) संजीव बाजपेयी म्हणाले, “रेल्वे कर्मचारी दीपक (३०) हे ४ एप्रिल रोजी नजीबाबादमधील आदर्शनगर येथील त्यांच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळले.”

हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले

पोलिसांनी सांगितले की, ‘त्याची पत्नी शिवानीने तिचा दीर पीयूषला फोन करून सांगितले की दीपकला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्याला रुग्णालयात घेऊन जात आहे. रुग्णालयात पोहोचेपर्यंत दीपकचा मृत्यू झाल्याची माहिती तिने पीयूषला दिली होती. संशय व्यक्त करून पोलिसांनी लेखी तक्रार दाखल केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

वाचा: सुंदर भाचीवर आला देखण्या मामाचा जीव; दोघांनी एकत्र घालवली रात्र, मन भरलं नाही म्हणून केलं कांड

पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे उघड झाले रहस्य

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले आहे की दीपकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नाही तर गळा दाबल्याने झाला. या खुलाशानंतर, आम्ही शिवानीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दीपकच्या मृत्यूसंदर्भात शिवानीची चौकशी करण्यात आल्याची पुष्टी वाजपेयींनी केली.’

दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

त्यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान असे आढळून आले की दीपक आणि शिवानी यांचा सुमारे दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना सहा महिन्यांची मुलगी देखील आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीने तिच्या प्रियकर आणि पतीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. पतीच्या हत्येनंतर, शिवानी तिचे म्हणणे बदलून पोलिसांना दिशाभूल करत आहे.

पोलिसांचा तपास सुरूच

प्रथम तिने लखीमपूर खेरी येथील एका तरुणाचे नाव सांगितले आणि त्याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याने प्रेमसंबंध नाकारले. आता दीपकच्या एका नातेवाईकासोबतच्या प्रेमसंबंधाचे प्रकरण समोर आले आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.