AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : मोबाईल न दिल्याच्या रागातून तरूणाची हत्या, मृतदेह लपवण्यासाठी लढवलेली शक्कल पाहून…

तरूणाने दुसऱ्या इसमाकडे मोबाईल मागितला, मात्र त्याने तो दिला नाही. यामुळे तो भडकला आणि त्याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि थेट त्याच्या डोक्यात...

Thane Crime : मोबाईल न दिल्याच्या रागातून तरूणाची हत्या, मृतदेह लपवण्यासाठी लढवलेली शक्कल पाहून...
| Updated on: Sep 07, 2023 | 8:40 AM
Share

अंबरनाथ | 7 सप्टेंबर 2023 : राज्यातील गुन्ह्यांचं प्रमाण आणि त्याची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून लोकं एकमेकांच्या जीवावर उठायला देखील कमी करत नसल्याचे समोर आले आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. मोबाईल मागितला, पण तो दिला नाही याचा एका तरूणाला एवढा राग आला की त्याने मागचा-पुढचा काहीच विचार न करता समोरील व्यक्तीच्या डोक्यात सरळ लोखंडी रॉडने (iron rod) वार केला. मात्र तो वार जीवघेणा ठरला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यावर (crime news) संपूर्ण शहरातच दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

त्या दिवशी नेमकं काय झालं ?

ही दुर्दैवी घटना अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव परिसरात एमआयडीसी जवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. हे बांधकाम सुरू असताना तेथे लालजी सहाय हा तरुण फोनवर होता. तेवढ्या शंभू मांझी हा तरूण तिकडे आला आणि त्याने लालजी यांच्याकडे मोबाईल मागितला. मात्र लालजी यांनी त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. मात्र याचा शंभूला प्रचंड राग आला आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता संतापाच्या भरात बाजूला पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि लालजी यांच्या डोक्यात जोरात वार केला. तो घाव वर्मी बसल्याने लालजी यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र हे पाहून शंभू भानावर आला आणि मृतदेह पाहून घाबरला.

अशी लावली मृतदेहाची विल्हेवाट

या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न त्याला पडला. मदतीसाठी त्याने मनोदीप जामु, चिल्ला मांझी या दोन मित्रांची मदत घेतली आणि पालेगाव जवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या एका डबक्यात तो मृतदेह फेकून ते तिघेही फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस दाखल घटनास्थळी झाले. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन वेगाने तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी 40 संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता तिघांवर संशय बळावला. त्यानंतर खबरीही कामाला लागले आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून शंभू मांझी,मनोदीप जामु,चिल्ला मांझी या तिन्ही आरोपींना अंबरनाथ मधून अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिनही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावले, अशी पोलीस निरीक्षकांनी दिली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल