
भारतीय शिक्षण प्रणालीचा प्रवास गुरुकुल ते व्यावसायिक कोचिंग व्हाय शाळा, महाविद्यालय असा झाला आहे. गुरुकुलमध्ये विद्यार्थी गुरुंच्या घरी म्हणजे आश्रमात जाऊन शिक्षण घेत होते. त्यासाठी कठोर नियम होते. गुरुकुलमध्ये जाऊन शिष्य गुरुंकडून विज्ञान, वेद, कला, साहित्य, शस्त्र चालवण्याचे आदी प्रकारचे शिक्षण घेत होते. त्या ठिकाणी गरीब श्रीमंत काहीच भेद नव्हता. अगदी राजा महाराजांची मुले गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी येत होते. त्या गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास होत होता. काळानुसार शिक्षण बदलले. शिक्षण प्रणाली बदलली. गुरुकुलऐवजी शाळा, महाविद्यालये सुरु झालीत. शाळांमध्ये कठोर शिस्तीचे शिक्षक असायचे. त्यामुळे “छडी लागे छम छम विद्या येई घम घम” हा वाक्यप्रचार प्रचलित झाला. परंतु काळाच्या ओघात शाळांमध्ये छडीचा वापर बंद झाला. शिक्षण प्रणालीत झाला बदल हसत खेळत शिक्षण सुरु झाले. त्या काळातही शिकवणी म्हणजे कोचिंग लावणे म्हणजे कच्चा विद्यार्थी समजला जात होता. परंतु आता नामांकीत क्लास लावणे हे स्टेट्स झाले आहे....