Petrol, diesel rates : ग्राहकांना सरकारचा मोठा झटका; पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीच्या दराबाबत सर्वात मोठी अपडेट
कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये भारतात देखील पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याचे पहायला मिळाले, एलपीजी गॅसची किंमत देखील वाढवली, त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता संपला आहे, पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ही भारतासाठी मोठी गुड न्यूज आहे, कारण यामुळे आता कच्चं तेल आणि एलपीजी गॅस पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात देखील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. 28 फेब्रुवारी जोरी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली होती, त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्यात आल्याने भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्याने त्याचा फटका हा ग्राहकांना बसल्याचं पहायला मिळालं, भारतामध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर वाढवण्यात आले. दरम्यान आता पुन्हा एकदा कच्चं तेल स्वस्थ झाल्याने पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे जरी कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी देखील लगेचच देशात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार नाहीये. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस आणि पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे, मात्र याचा फायदा हा लगेचच ग्राहकांना होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे, जागतिक स्थरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. मात्र हे स्वस्त दरातील तेल भारतापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे भारतामध्ये लगेचच पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होणार नसल्याचं गोपी यांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ असा की जरी कच्चं तेल स्वस्त झालं असतं तरी देखील पेट्रोल, डिझेलच्या किंमती जैसे थे राहण्याची शक्यता असून, त्याचा कोणताही फायदा सध्यातरी भारतीय ग्राहकांना होण्याची चिन्हं नाहीत.
पुढे बोलताना गोपी यांनी म्हटलं की, अलिकडेच इंधनाच्या दरात प्रति लिटर जवळपास 3.94 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, मात्र लगेचच आता वाढलेल्या किंमती या कमी करता येणार नाहीत. जरी जागतिक स्तरावर कच्चं तेल स्वस्थ झालं असलं तरी देखील हे कच्चं तेल भारतापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. फेब्रुवारी महिन्यात युद्धाला सुरुवात झाली, तेव्हापासून या युद्धाचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना झाला आहे. कच्च्या तेलाचे दर वाढलेले असताना देखील भारत सरकारने नागिकांना इंधन दरवाढीची फार मोठी झळ बसू दिली नाही. यामुळे केंद्र सरकारला तब्बल 12000 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे, त्यामुळे तूर्तास तरी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही कपात होण्याची शक्यता नाहीये.
