ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या नात्यावर थेट बोलला अभिषेक बच्चन, म्हणाला, मला अशा लग्नात राहायचे नाही ज्याठिकाणी..

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अभिषेकची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, मागील काही वर्षे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या नात्यावर थेट बोलला अभिषेक बच्चन, म्हणाला, मला अशा लग्नात राहायचे नाही ज्याठिकाणी..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
| Updated on: Apr 04, 2026 | 9:46 AM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय हिचे खासगी आयुष्य तूफान चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा होती. यावर काही दिवस बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. शेवटी अभिषेक बच्चन पुढे येऊन यावर बोलताना दिसला. अभिषेक बच्चन याने थेटपणे त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य केले. नुकताच अभिषेक बच्चन याने एक मुलाखत दिली. त्याच्या या मुलाखतीची तूफान चर्चा होताना दिसत आहे. यामध्ये त्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे भाष्य केले.

अभिषेक बच्चन याने लिली सिंगला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना दिसला. अभिषेक बच्चन याने म्हटले की, मुळात म्हणजे ज्यावेळी माझ्या आई वडिलांचे लग्न झाले, त्यावेळी माझी आई देखील वडिलांपेक्षा मोठी स्टार होती. आताच नाही तर त्यावेळीही ते नक्कीच सामान्य नव्हते. मी माझ्या करिअरच्या सुरूवातीपासूनच ऐश्वर्या राय हिला ओळखत होतो.

मी तिच्यासोबत काही चित्रपटांमध्येही काम केले. पण त्यावेळी आमच्यात काही नव्हते. त्यावेळी आम्ही चांगले मित्र होतो. आमच्या नात्यात सुरूवातीच्या काळापासून ते आतापर्यंत एक पार्टनरशिप आहे. मला अशा पार्टनरशिप किंवा लग्नात राहायचे नव्हते जिथे मला पुरूष असल्यासारखे वाटावे. लग्नानंतर माझ्या पत्नीने कधीच काम थांबवावे, असे मला वाटले नाही. मी देखील नशिबवान आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. दोघे विभक्त होणार असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. आता आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल स्पष्टपणे अभिषेक बच्चन बोलताना दिसत आहे. लग्नानंतर माझ्या पत्नीने काम थांबवावे, अशी माझी कधीच इच्छा नसल्याचेही त्याने म्हटले आहे. मध्यंतरी चर्चा सुरू होती की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद वाढला आहे. ऐश्वर्या राय हिने जलसा बंगलाही सोडला आहे.

Follow Us