
टेलिव्हिजनवरील 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत नंदिनी अय्यरची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भोसलेनं अभिनयविश्वाला रामराम केला आहे. वयाच्या 23 व्या वर्षीच अनघाने तिच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला.

वयाच्या 23 व्या वर्षी अनघाने झगमगत्या अभिनयविश्वाला सोडून भक्तीच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. 'अनुपमा' या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. अनघाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयी माहिती दिली होती.

इतक्या कमी वर्षात अभिनयविश्वातील करिअरला कायमचं रामराम करण्याचा तिचा निर्णय अनेकांना थक्क करणारा होता.

एका मुलाखतीत अनघाने यामागचं कारण सांगितलं. सतत शूट्समध्ये व्यस्त राहिल्याने भक्तीसाठी वेळ मिळत नव्हता, असं ती म्हणाली. याच कारणामुळे तिने पूर्ण वेळ भक्तीला देण्याचा निर्णय घेतला.

अनघाने कृष्णभक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. "जर तुम्ही एकदा भगवान श्रीकृष्णाचा हात पकडला तर ते तुमचा हात कधीच सोडत नाहीत. भक्तीचा मार्गच तुम्हाला शांतीच्या दिशेने नेऊ शकतो," असं ती म्हणते.

अनघाच्या मते असे निर्णय आयुष्यात लवकरच घेतले पाहिजेत. अनघा कृष्ण भक्त असून तिने अद्याप संन्यास घेतला नाही. जी व्यक्ती तिच्याप्रमाणेच कृष्ण भक्त असेल, त्याच्याशीच लग्न करणार असल्याचं तिने सांगितलं.

'अनुपमा' या मालिकेनंतर तिला आणखी एका शोची ऑफर मिळाली होती. मात्र अनघाने ती ऑफर नाकारली.

इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारी अनघा तिच्या फॉलोअर्ससोबत कृष्णभक्तीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.