Bigg Boss 16: अर्चना गौतमला शोमधून काढल्यानंतर प्रेक्षकांची बिग बॉसलाच धमकी; म्हणाले..

| Updated on: Nov 09, 2022 | 7:09 PM

अर्चना गौतमला शोमधून काढल्याने बिग बॉसला मोठा फटका?

Bigg Boss 16: अर्चना गौतमला शोमधून काढल्यानंतर प्रेक्षकांची बिग बॉसलाच धमकी; म्हणाले..
Archana Gautam
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- बिग बॉस 16 या शोमधून ड्रामाक्वीन अर्चना गौतमला काढून टाकल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. शिव ठाकरेवर हाच उचलल्याने अर्चनावर ही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या निर्णयानंतर अर्चनाच्या चाहत्यांनी बिग बॉसलाची धमकी दिली आहे.

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत अर्चनाने अंकित आणि सुंबुल यांना नॉमिनेट केलं होतं. त्यावेळी अंकित आणि अर्चना यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यावरूनही नेटकरी कमेंट्स करत आहेत. अनेकांनी अर्चनाला शोमध्ये परत आणण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अर्चनामुळे बिग बॉसचं यंदाचं सिझन बघायची इच्छा तरी होत होती, मात्र आता तिच नसल्याने शो बघायचंच बंद करणार, असा इशारा काही चाहत्यांनी दिला. तर काहींनी शिव ठाकरेवर टीका केली. भांडणासाठी शिवनेच अर्चनाला भडकावलं, असं मत काहींनी मांडलं.

अर्चना गौतमला पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात एंटरटेन्मेंट क्वीनचा किताब देण्यात आला होता. शो मध्ये ती सर्वांत एंटरटेनिंग स्पर्धक असल्याचं म्हटलं जात होतं. सलमान खाननेसुद्धा अर्चनाचं कौतुक केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्चना ही बिग बॉसच्या घरात सर्वांशी भांडतानाच दिसली. शिव ठाकरे, प्रियांका आणि सुंबुल यांच्याशी तिचे जोरदार वाद झाले.