Happy Birthday Amitabh Bachchan | कठीण काळात मेहमूद यांनी अमिताभ बच्चनला दिली साथ, ‘या’ कारणामुळे नात्यात आला दुरावा!

| Updated on: Oct 11, 2021 | 10:35 AM

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने प्रत्येकाची मने जिंकली आहेत. ते इंडस्ट्रीमध्ये 50 वर्षांहून अधिक काळ सक्रिय आहेत आणि ते आपल्या कामाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अमिताभ बच्चन आज त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Happy Birthday Amitabh Bachchan | कठीण काळात मेहमूद यांनी अमिताभ बच्चनला दिली साथ, ‘या’ कारणामुळे नात्यात आला दुरावा!
Amitabh Bachchan
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने प्रत्येकाची मने जिंकली आहेत. ते इंडस्ट्रीमध्ये 50 वर्षांहून अधिक काळ सक्रिय आहेत आणि ते आपल्या कामाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अमिताभ बच्चन आज त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी प्रयागराज येथे झाला. अमिताभ बच्चन यांनी इंडस्ट्रीत पाऊल टाकताना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. पण एक वेळ अशी आली जेव्हा त्याला मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही.

प्रत्येकाचे कोणी ना कोणी गॉडफादर असतात. अमिताभ बच्चन यांचेसुद्धा होते. ज्येष्ठ अभिनेते मेहमूद हे त्यांचे गॉडफादर होते ज्यांनी बिग बींना कठीण काळात मदत केली. त्यांनीच अमिताभ यांना चित्रपटात काम दिले. पण नंतर असे काही घडले ज्यामुळे त्यांच्या नात्याला तडा गेला.

अमिताभ बच्चन यांनी केला घरी परतण्याचा विचार

जेव्हा अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हते, तेव्हा निराशेने त्यांनी घरी परत जाण्याचा विचार केला. त्यावेळी मेहमूदने अमिताभ बच्चन यांना त्यांच्या ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटात कास्ट केले होते. त्यांनी स्वतः या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. एवढेच नाही तर संघर्षाच्या दिवसांमध्ये मेहमूदने बिग बींना आपल्या घरातही ठेवले होते.

वडिलांसमान!

एका मुलाखतीत मेहमूदने स्वतःला अमिताभ बच्चन यांचे दुसरे वडील म्हणून वर्णन केले होते. त्यांनी सांगितले होते की, त्यांनी अब्मिताभ यांना पैसे कमवायला शिकवले होते. त्यांनी बिग बींना यशाचा मार्ग दाखवला. त्यांनी अमिताभ यांना ‘बॉम्बे’ हा चित्रपट दिला, ज्यात सलीम-जावेद जोडीने त्यांची दखल घेतली आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट ‘जंजीर’ मिळाला. जो त्यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला.

यामुळे आली कटुता!

मेहमूद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन आजारी पडले होते, तेव्हा मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. पण जेव्हा माझी बायपास सर्जरी झाली होती, तेव्हा अमिताभ वडिलांसोबत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आले होते, पण ते मला भेटले नव्हते. अमिताभ यांनी सिद्ध केले की, खरा पिता हाच खरा असतो. तो मला भेटायला आला नाही, इच्छा केली नाही आणि गेट वेल सून कार्ड किंवा अगदी लहान फूल पाठवले नाही. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती होती. मी त्याला माफ केले आहे आणि तो आजारी पडू नये अशी इच्छा आहे. मला आशा आहे की, तो पुन्हा कधीच असे करणार नाही.

हेही वाचा :

कमाल करती हो पांडेजी, चंकी पांडेची दुसरी पोरगी पहिलीपेक्षा हॉट, पहा बिकिनी फोटोज

जमलं एकदाचं, रकुल प्रीत सिंह म्हणते, दे दे प्यार दे, इन्स्टावर पोस्ट टाकत प्यार करेंगे खुल्लम खुल्ला, ‘तो’ कोण?