Thalaivii :  ‘थलायवी’मुळे कंगना रनौतला कायमस्वरूपी ‘स्ट्रेच मार्क्स’, अवघ्या सहा महिन्यात वजन वाढून केले होते कमी!

| Updated on: Sep 27, 2021 | 12:24 PM

बॉलिवूडची ‘धाकड’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दलची अग्निपरीक्षा एका पोस्टद्वारे सांगितली आहे. आता तिचे वजन कमी झाले आहे, पण आता ती एका नवीन समस्येत अडकली आहे.

Thalaivii :  ‘थलायवी’मुळे कंगना रनौतला कायमस्वरूपी ‘स्ट्रेच मार्क्स’, अवघ्या सहा महिन्यात वजन वाढून केले होते कमी!
Kangana Ranaut
Follow us on

मुंबई : बॉलिवूडची ‘धाकड’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दलची अग्निपरीक्षा एका पोस्टद्वारे सांगितली आहे. आता तिचे वजन कमी झाले आहे, पण आता ती एका नवीन समस्येत अडकली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. चाहते कंगनाच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. तसे, आजकाल कंगना तिच्या आगामी ‘थलायवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता कंगनाने अलीकडेच ‘थलायवी’ चित्रपटातील तिच्या ट्रान्सफॉर्मेशन विषय सांगितले आहे.

कंगनाने वाढवले होते तब्बल 20 किलो वजन

आम्ही तुम्हाला सांगू की ‘थलायवी’  या चित्रपटात दिवंगत नेत्या जयललिता यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण दाखवण्यात आला आहे, ज्यात त्यांचा तरुण दक्षिण सुपरस्टार ते राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने पडद्यावर ही भूमिका साकारली आहे.

कंगनाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी कंगना रनौतला तिचे शरीर परिवर्तन करावे लागले. अलीकडेच, कंगनाने सोशल मीडियावर याचा खुलासा केला आहे की, तिने सहा महिन्यांत 20 किलो वजन कसे वाढवले ​​आणि नंतर ते सहा महिन्यांत कसे कमी केले.

कंगनाने शेअर केली पोस्ट

अलीकडेच, अभिनेत्रीने परिवर्तनाचे अर्थात बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये फक्त एवढेच सांगण्यात आले की, या बदलामुळे तिच्या शरीरावर ‘परमनंट स्ट्रेच मार्क्स’ आले आहेत.

काय म्हणाली अभिनेत्री?

कंगनाने लिहिले आहे की, 6 महिन्यांत 20 किलो वजन वाढवणे आणि 6 महिन्यांत ते कमी करणे, तेही 30व्या वर्षी… माझ्या शरीरात अनेक गोष्टी बदलल्या आहेत, मला कायमस्वरूपी स्ट्रेच मार्क्स देखील आले आहेत. पण काहीतरी बनवण्यासाठी किंमत मोजावी लागेल, कला जिवंत असते आणि कधीकधी ती किंमत स्वतः कलाकार असते.’

‘थलायवी’साठी कंगनाचे कौतुक!

कंगना रनौतचे ‘थलायवी’साठी खूप कौतुक झाले आहे. सर्वांनी कंगनाच्या अभिनयाचे खूप कौतुक केले आहे, हे उल्लेखनीय आहे की एएल विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ चित्रपटात कंगना रनौतने पडद्यावर जे जयललिता यांचे पात्र साकारले आहे. जयललिता यांनी दक्षिण चित्रपट उद्योगात भरपूर नाव कमावल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता आणि इथेही त्यांनी यशाचा नवा इतिहास रचला. चित्रपटात कंगना व्यतिरिक्त साऊथ सुपरस्टार अरविंद स्वामी, मधु आणि भाग्यश्री सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले.

हेही वाचा :

Aamna Sharif : पांढऱ्या लेहेंग्यामध्ये आमना शरीफच्या घायाळ करणाऱ्या अदा, सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

Movies Release Date : चित्रपटगृहांमध्ये धमाल करण्यासाठी बॉलिवूड अभिनेते तयार, पाहा 2021 ते 2023पर्यंत रिलीज होणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी