भगव्या रंगावरून वाद पेटला, परमहंस आचार्य म्हणाले शाहरुख खान याला जिवंत जाळणार

नुकताच पठाण चित्रपटातील झूमे जो या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय.

भगव्या रंगावरून वाद पेटला, परमहंस आचार्य म्हणाले शाहरुख खान याला जिवंत जाळणार
| Updated on: Dec 20, 2022 | 9:08 PM

मुंबई : पठाण चित्रपटामुळे आता अभिनेता शाहरुख खान याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यापासून दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांना ट्रोल केले जात आहे. इतकेच नाहीतर आता तर थेट धमकी ही शाहरुख खान याला देण्यात आलीये. नुकताच पठाण चित्रपटातील झूमे जो या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. मात्र, बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे मोठा वाद सुरू आहे. आता तर या गाण्यामुळे थेट शाहरुख खान याला जिवंत जाळून टाकण्याची धमकी देण्यात आलीये.

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे हटवून टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अजून चित्रपट निर्माते किंवा शाहरुख खान याने यावर काहीच भाष्य केले नाहीये. सोशल मीडियावर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू आहे.

संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचा विरोध करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इतकेच नाहीतर शाहरुख खान याला जिवंत जाळून टाकण्याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.

अयोध्यातील संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी म्हटले की, माझे काही माणसे हे शाहरुख खान याचा शोध घेत आहेत. शाहरुख खान हा भेटला की, त्याला जिवंत जाळायचे आहे.

पठाण चित्रपटामध्ये भगव्या रंगाचा अपमान केला आहे. हा एक विचार करून केलेला मोठा प्लॅन आहे. हिंदु लोकांच्या भावनांशी खेळणे हा एक धंधाच झाला आहे. पैसे कमावण्यासाठी असे प्रकार केले जात आहे.

पुढे परमहंस आचार्य म्हणाले, आज शाहरुख खान याचे पोस्टर जाळले आहे. आता मी त्याला शोधत आहे. जेंव्हा तो प्रत्यक्ष भेटेल तेंव्हा या जिहादीला जिवंत जाळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us