AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gufi Paintal | मृत्यूपूर्वी कशी होती ‘महाभारता’तील शकुनी मामा यांची अवस्था? पुतण्याने सांगितले शेवटचे क्षण

शेवटच्या क्षणी कशी होती शकुनी मामा यांची अवस्था? पुतण्याने सांगितले अभिनेत्याचे शेवटचे क्षण.... सध्या सर्वत्र गुफी पेंटल यांच्या निधनाची चर्चा...

Gufi Paintal | मृत्यूपूर्वी कशी होती ‘महाभारता’तील शकुनी मामा यांची अवस्था? पुतण्याने सांगितले शेवटचे क्षण
| Updated on: Jun 05, 2023 | 3:06 PM
Share

मुंबई : ‘महाभारता’तील शकुनी मामा यांची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांचं सोमवारी निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी गुफी पेंटल यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी गुफी पेंटल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे त्यांचं निधन झालं आहे. गुफी पेंटल यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी गुफी पेंटल यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सर्वत्र गुफी पेंटल यांच्या निधनाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, गुफी पेंटल यांचा पुतण्या आणि अभिनेता हितेन पेंटल यांनी काकांच्या निधनपूर्वीच्या क्षणांबद्दल सांगितलं आहे.

नुकताच एक मुलाखतीत हितेय याने गुफी पेंटल यांच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. हितेन म्हणाला, ‘गुफी काका यांचं निधन सोमवारी सकाळी जवळपास ९ वा. च्या सुमारास झालं. आजची सकाळ आमच्यासाठी प्रचंड वेदनादायक होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण अचानक आज सकाळी त्यांचं निधन झालं.’

गुफी पेंटल यांच्याबद्दल पुढे अभिनेता म्हणाला, ‘गुफी काकांसोबत आज सकाळी आठ वाजता बोलणं झालं. थोड्या वेळानंतर ते झोपले. त्यानंतर गुफी काका उठलेच नाहीत. झोपेतच त्यांचं निधन झालं.’ गुफी पेंटल यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. गुफी पेंटल यांना सात ते आठ दिवसांपूर्वी अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा गुफी पेंटल यांची प्रकृती नाजूक होती. हितेनने दोन दिवसांपूर्वी गुफी पेंटल यांच्या आरोग्याबाबतचे अपडेटही मीडियाला दिले होते. हितेन म्हणाला होता, ‘गुफी काका अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा आजार होता आणि नंतर किडनीचा त्रास होवू लागला. दोन दिवसांपूर्वीपर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण रविवारी ​​डॉक्टरांनी आम्हाला कळवले की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.’

बीआर चोपडा यांची ‘महाभारत’ ही मालिका त्याकाळी खूप गाजली होती. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. ‘महाभारत’ मालिकेशिवाय गुफी यांनी कानून, सौदा, अकबर बीरबल, कर्ण संगिनी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय अनेक सिनेमांमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.

Follow Us
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?