लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…, लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर मनातील खंत बोलूनच दाखवली
झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचल्या तरी, खासगी आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा समाना करावा लागतो... असं काही लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे... लग्नानंतर समोर आलेल्या अडचणींबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे...

लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पण खऱ्या आयुष्याची सुरुवात देखील लग्नानंतर होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण आई – वडिलांच्या घरी मुलींच्या खांद्यावर फार जबाबदारी नसते, पण लग्न झाल्यानंतर एका रात्रीत सर्वकाही बदलतं. अशात त्यामध्ये स्वतःला सामावून घेणं मुलींसाठी काही प्रमाणात कठीण होतं… अशात मराठी अभिनेत्रींबद्दल सांगायचं झालं तर, त्या करियरसोबत कुटुंबाला देखील फार महत्त्व देतात. पण शुटिंगचे तास, प्रवास सततची धावपळ, घराची – कुटुंबियांची जबाबदारी… या सर्व गोष्टी एकत्र सांभाळणं अभिनेत्रींपुढे मोठं आव्हान असतं… तरीही अनेक अभिनेत्री हा वर्क-लाइफ बॅलन्स उत्तम प्रकारे सांभाळताना दिसतात. तर काहींना सासरी गेल्यानंतर त्रासही सहन करावा लागतो.
असंच काही प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी गोडबोले हिच्यासोबत देखील घडलं आहे. एका मुलाखतीत किशोरी हिने लग्न झाल्यानंतर आलेल्या अडचणींबद्दल मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘माहेरी कलेचं वातावरण होतं, त्यामुळे सर्वकाही छान होतं… पण लग्नानंतर ते खूप कठीण झालं… मनोरंजन क्षेत्र खूप टाईम – डिमांडिंग आहे… 12 तासांची शिफ्ट आणि आता तर 13 तासांची झाली आहे… तेव्हा मला धडकीच भरली… मुंबईच जायचं – जायचं… ट्राफीक… दीड ते दोन तास प्रवास… त्यामुळे घराबाहेर 14 तास…’
‘लग्नानंतर सुरुवातीला माझ्या सासरी बिलकूल चाललं नाही. सगळे एकच म्हणायचे, ‘काय तू कायम घराबाहेरच असतेस…? 9 टू 5 जॉब नसल्यामुळे मी त्यांना कसं सांगू की 12 तासांची तर फक्त शिफ्ट असते… त्यानंतर प्रवास… लग्नानंतर सुरुवातीला खूप त्रास झाला… पण आपल्याला समोरच्यांचा विश्वास कमवावा लागतो… जेव्हा त्यांना हळू – हळू माझं काम कळू लागले… तेव्हा त्यांने ते आवडत गेलं… मी टेलिव्हिजनच करायचे… त्यांनी देखील मला हळूहळू समजून घेतलं…’, असं देखील किशोरी यांनी सांगितलं…
View this post on Instagram
किशोरी गोडबोले हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिकांच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक सिनेमांमध्ये देखील किशोरी हिने भूमिका बजावली. सोशल मीडियावर देखील किशोरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
