रेखाचे ते सुपरहिट गाणं! 35 वर्षानंतरही लग्नसोहळ्यात वाजते, महिला धरतात ठेका

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले आहे. त्यांचे एक गाणे आजही चर्चेत आहे. आज आपण त्यांच्या 35 वर्षांपूर्वीच्या गाण्याविषयी जाणून घेणार आहेत.

रेखाचे ते सुपरहिट गाणं! 35 वर्षानंतरही लग्नसोहळ्यात वाजते, महिला धरतात ठेका
Rekha song
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 11:37 AM

एखादा लग्न सोहळा म्हटलं की सर्वात आधी संगीत सोहळ्याची चर्चा सुरु होते. खेडे-गावात आजही लग्नाच्या एक दिवस आधी महिलांची महफिल सजते. यावेळी पारंपरिक विवाह गीतांसोबत काही बॉलिवूड गाणीही पूर्ण उत्साहाने गायली जातात. याच सदाबहार गीतांमध्ये अभिनेत्री रेखा यांच्या ‘फूल बने अंगारे’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘छोरी कब से हुई जवां’ समाविष्ट आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेले हे गाणे आजही अनेक लग्नांची रौनक वाढवते. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजातील हे गाणे ढोलकीच्या तालावर असे रंग भरते की महिला संगीताची महफिल त्याशिवाय अपूर्ण मानली जाते.

महिला संगीताची पहिली पसंती बनलेले रेखाचे हे गाणे

१९९१ मध्ये रिलीज झालेल्या ‘फूल बने अंगारे‘ चित्रपटात हे गाणे लग्न आणि संगीताच्या वातावरणात चित्रित करण्यात आले होते. पडद्यावर ज्या प्रकारे ते सादर करण्यात आले तोच अंदाज हळूहळू गावे आणि लग्नांचा भाग बनला. आजही अनेक ठिकाणी लग्नाच्या विधींमध्ये महिला सर्वप्रथम ‘छोरी कब से हुई जवां’ गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करतात. ढोलकीचा आवाज, टाळ्या आणि पारंपरिक अंदाजासोबत हे गाणे नव्या पिढीपर्यंत पोहोचले आहे. यामुळे तीन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

लता मंगेशकर यांनी दिला आवाज

या गाण्याला आपल्या मधुर आवाजाने गानकोकिळा लता मंगेशकर यांनी सजवले होते. या गाण्याचे संगीतकार बप्पी लाहिरी आहेत. त्यांनी पारंपरिक लोकसंगीताचा रंग आणि चित्रपटातील धुनचा उत्तम मेळ साधला आहे. गीताचे बोल प्रसिद्ध गीतकार अंजान यांनी लिहिले होते, जे सरळ लोकांच्या हृदाला भीडले. यामुळे हे गाणे केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित राहिले नाही, तर खेडे-गावांच्या सांस्कृतिक परंपरांचा भाग बनले. आजही जेव्हा एखाद्या लग्नात ढोलकी वाजते, तेव्हा ‘छोरी कब से हुई जवां’ हे गाणे ऐकू येणे सामान्य आहे. हे गाणे त्या निवडक बॉलिवूड गाण्यांपैकी आहे, ज्यांनी काळाच्या ओघात आपली लोकप्रियता टिकवून ठेवली.

चित्रपटाची कथा

या चित्रपटाची कथा नम्रता (रेखा) यांच्या भोवती फिरते, जी एक साधी पण साहसी महिला आहे. तिचे लग्न एका प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर रणजीत (रजनीकांत) यांच्याशी होते. रणजीत शहरातील भ्रष्ट राजकारणी आणि गँगस्टर बिशंबर प्रसाद यांच्याविरुद्ध सातत्याने कारवाई करतात, ज्यामुळे बिशंबर त्यांचा रस्त्यातला काटा बनतो. एक दिवस बिशंबर प्रसाद आणि त्याचे गुंड रणजीत यांची हत्या करतात. या घटनेनंतर नम्रता एकटी पडते आणि पतीच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्धार करते. न्याय मिळवण्यासाठी ती स्वतः पोलीस दलात सामील होण्याचा निर्णय घेते आणि कठोर प्रशिक्षणानंतर पोलीस इन्स्पेक्टर (नंतर एसपी) बनते.

Follow Us