बाहेरच्या क्रूर जगापेक्षा तुरुंगातील लोक…, रिया चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा, अखेर असं झालं तरी काय?
Rhea Chakraborty Recall Jail Days: अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती 27 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागलेला. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रिया चक्रवर्ती हिने तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल आणि तेथील लोकांबद्दल मोठं खुलासा केला... तर जाणून घ्या अभिनेत्री असं काय म्हणाली.

Rhea Chakraborty Recall Jail Days : अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही, अभिनेत्री सिनेमांमध्ये दिसली नसली तरी, अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे कायाम चर्चेत असते. 2020 मध्ये एनसीबीने रिया हिला अटक केलेली आणि अभिनेत्रीने 27 दिवस तुरुंगवास भोगला. 14 जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर, दिवंगत अभिनेत्याला गांजा पुरवल्याच्या आरोपावरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती; परिणामी, तिला सुमारे 27 दिवस तुरुंगात काढावे लागले.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रिया हिला विचारण्यात आलं की, तुरुंगात लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी काय करायची? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘ती लोकं गाणी म्हणतात, डान्स करता आणि ठेचा बनवतात.’, तुरुंगातील महिलांबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘तुरुंगातील लोक तुरुंगातील बाहेरच्या लोकांपेक्षा कित्येक पटीने चांगली आहेत. कारण खटला प्रलंबित असलेल्या कैद्यांमधील महिला निर्दोष असतात आणि तिथे सगळे समान असतात. कोणाला कोणतं नाव नसतं. सगळ्यांकडे फक्त एक नंबर असतो…’
पुढे रिया हिला तुला तुझा नंबर आठवत आहे का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने आधी होकार दिला, त्यानंतर रिया नाही म्हणाली. सांगायचं झालं तर, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित अमली पदार्थांच्या प्रकरणात रियाला गेल्या वर्षी मोठा कायदेशीर दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने एनसीबीला तिचा पासपोर्ट कायमस्वरूपी परत करण्याचे निर्देश दिले. आज अभिनेत्री आनंदी आयुष्य जगत आहे.
रिया आता ‘द ट्रेटर्स’ (The Traitors) या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे; हा सीझन 13 ऑगस्ट 2026 रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. शोचं होस्ट दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. तर मल्लिका शेरावत, श्वेता तिवारी, मुनव्वर फारुकी, शालिनी पासी, अभिषेक मल्हान, क्रिस्टल डिसूज़ा, रणवीर बरार, दलीप ताहिल, पारुल गुलाटी, आदित्य कुलश्रेष्ठ, सौंदस मौफकीर, शाहनील गिल, साहिल सलाथिया आणि अन्य सेलिब्रिटी देखील सामिल होती.