AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khatron Ke Khiladi 11 : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानीने जिंकली KKK11ची ट्रॉफी

शोला त्याचा विजेता मिळाला आहे. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने शोच्या अंतिम फेरीत दिव्यांका त्रिपाठीला पराभूत करून खतरों के खिलाडीचे विजेतेपद पटकावलं आहे. (Khatron Ke Khiladi 11: Arjun Bijlani wins KKK11 trophy beating Divyanka Tripathi)

Khatron Ke Khiladi 11 : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानीने जिंकली KKK11ची ट्रॉफी
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 5:16 PM
Share

मुंबई : खतरों के खिलाडी 11 ( Khatron Ke Khiladi 11) च्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. या शोला त्याचा विजेता मिळाला आहे. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने (Arjun Bijlani) शोच्या अंतिम फेरीत दिव्यांका त्रिपाठीला (Divyanka Tripathi ) पराभूत करून खतरों के खिलाडीचे विजेतेपद पटकावलं आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली, तरी विजेत्याचे नाव समोर आलं आहे. शेवटचा भाग येत्या वीकेंडला प्रसारित होईल.

या प्रसिद्ध रिअॅलिटी शोचा शेवट मंगळवारी मुंबईत शूट करण्यात आला होता, त्या दरम्यान दिव्यांका त्रिपाठी, विशाल आदित्य सिंग, श्वेता तिवारी, निक्की तांबोळी सारखे सर्व स्पर्धक पोहोचले होते. विशाल आदित्य सिंग तिसऱ्या क्रमांकावर बाद झाला, त्यानंतर दिव्यांका आणि अर्जुन यांच्यात लढत झाली.

आतापर्यंत विजेत्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सोशल मीडियावरून असे संकेत मिळत आहेत की अर्जुन बिजलानी शोचा विजेता आहे. सुप्रसिद्ध टीव्ही पत्रकार सलील अरुण कुमार यांनी ट्विट करून चाहत्यांना सांगितलं की, अर्जुन बिजलानी शोचा विजेता बनला आहे. अर्जुन बिजलानीनं शोचा प्रत्येक धोकादायक स्टंट पूर्ण उत्साहाने केला आणि प्रत्येक अडथळा जिंकून खतरों के खिलाडीचा विजेता होण्याची ट्रॉफी जिंकली.

त्याने मनापासून प्रत्येक स्टंट पूर्ण केला आणि शोचे होस्ट रोहित शेट्टीला प्रभावित केलं. टॉप 3 दिव्यांका त्रिपाठी आणि विशाल आदित्य सिंह अर्जुन बिजलानीसह पोहोचले होते. त्यानंतर विशाल पहिल्यांदा टास्कमध्ये आणि नंतर अंतिम सामन्यात अर्जुननं दिव्यांकाचा पराभव केला.

पाहा पोस्ट (See Post)

पत्रकार सलील अरुण कुमार यांनी दिव्यांकाबद्दल ट्विट केले की, “खतरों के खिलाडी 11 चे नाव दिव्यांका त्रिपाठीच्या नावावर ठेवलं. तिने संपूर्ण शोमध्ये राज्य केलं आणि ते साध्य केलं. बॅड लक गर्ल! तू एक रॉक स्टार आहेस.” दिव्यांका संपूर्ण शोमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना दिसली. तिने अर्जुनला फायनल टास्कमध्येही कडवी स्पर्धा दिली.

सध्या चाहते यासंदर्भात अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Sanak | विद्युत जमवाल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘सनक’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार!

KBC 13 | अमिताभ बच्चनच्या ‘केबीसी 13’ला मिळणार दुसरा करोडपती, प्रांशू जिंकेल का 1 कोटींचं बक्षीस?

Rahul Vaidya Disha Parmar : ‘खतरों के खिलाडी 11’ च्या फायनल शूटनंतर राहुल वैद्य आणि दिशा परमार निघाले हनिमूनला

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.