AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेह असणाऱ्यांसाठी ‘हे’ पदार्थ म्हणजे विषचं; चुकूनही यांचे सेवन करू नका अन्यथा रक्तातील साखर उच्चांक गाठेल

मधुमेह असलेल्यांनी काळजीपूर्वक आहार निवडणे आवश्यक आहे. मधुमेह असणाऱ्यांसाठी काही पदार्थ म्हणजे चक्क विषाप्रमाणे आहेत. त्याचे सेवन केलं तर रक्तातील साखरेची पातळी उच्चांक गाठेल. त्यासाठी असे कोणते पदार्थ आहे जे मधुमेह असणाऱ्यांनी पूर्णपणे टाळले पाहिजे. हे नक्की पाहा.

मधुमेह असणाऱ्यांसाठी 'हे' पदार्थ म्हणजे विषचं; चुकूनही यांचे सेवन करू नका अन्यथा रक्तातील साखर उच्चांक गाठेल
Diabetes Diet
| Updated on: Nov 14, 2024 | 1:23 PM
Share

मधुमेह म्हटलं की सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकतो. या आजारावर अद्याप तरी कायमस्वरूपी म्हणावा असा इलाज सापडलेला नाही. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीने यावर नियंत्रण ठेवता येतं. पण मुळात मधुमेह असणाऱ्यांनी आपल्या आहारात कशाचा समावेश करावा आणि कशाचा नाही याबाबत फार काटेकोरपणे नियम पाळायल हवे.

14 नोव्हेंबर रोजी ‘जागतिक मधुमेह दिवस’

मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी आहाराकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. मधुमेह असणारे रुग्ण जे काही आहार घेतात त्याचा थेट परिणाम त्याच्या रक्तातील साखरेवर होतो. त्यामुळेच मधुमेहाबाबत अधिक जनजागृती होणे गरजेच आहे. तर आज 14 नोव्हेंबर रोजी ‘जागतिक मधुमेह दिवसशी’ रक्तातील साखर नियंत्रीत राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या पदार्थांचे नाही हे जाणून घेऊयात.

तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या बाबतीत, खाण्यामध्ये थोडासा निष्काळजीपणा देखील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. मधुमेहामध्ये, अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे, ज्यांचे ग्लायसेमिक इंडेक्स पातळी खूप कमी आहे. तर, अशा कीही पदार्थाचे सेवन या व्यक्तींनी टाळले पाहिजे जे त्यांच्यासाठी चक्क विषासारखे काम करू शकतात.

मधूमेह रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ म्हणजे विषाप्रमाणे

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात तांदळाचा पास्ता, पांढरे पीठ, मैदा किंवा पांढराब्रेड यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश अजिबात करू नये. या सर्व पांढऱ्या गोष्टी साखरेची पातळी वाढवण्याचे काम करतात. यासोबतच रिफाइंड पीठ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक मानले गेले आहे. कारण त्यामध्ये साधे कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे सहजपणे ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. यामुळेच मधुमेहाला प्रोत्साहन मिळते. पाहूया कोणत्या पदार्थांनी रक्तातील साखर वाढू शकते.

‘ही’ फळे टाळावी

केळी, चेरी, द्राक्षे, आंबा यांसारख्या फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेच उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांमध्ये त्यांचा समावेश होतो. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे. तसेच चुकून मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कोल्ड्रिंक्सचे सेवन तर अजिबात करणे पूर्णपणे टाळा. अन्यथा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळणे

दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढते. दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे शक्यतो टाळले पाहिजे . कारण त्यामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टींपासून दूर राहणेच त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

चहा किंवा कॉफी टाळावी

बऱ्याच लोकांना त्यांच्या सकाळची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने करायला आवडते. पण चहा-कॉफी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, याची मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला सकाळी चहा प्यायचा असेल तर त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी किंवा शुगर फ्री ब्लॅक टी घेऊ शकता. मधुमेहादरम्यान तुम्ही कॅफिन असलेले सर्व पदार्थ टाळावेत. केवळ चहा आणि कॉफीच नाही तर दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यानेही रक्तातील साखर वाढते.

मधुमेहाच्या रुग्णांनी नॉनवेजपासून दूर राहणे कधीही उत्तम. कारण ते पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे शरीरातील पचनक्रियादेखील बिघडते. अशा परिस्थितीत या रुग्णांनी त्याचे सेवन अजिबात करू नये. याशिवाय कोलोकेशिया, रताळे, बटाटा, फणस इत्यादी नैसर्गिक साखर असलेल्या गोष्टीही त्यांच्यासाठी विषापेक्षा कमी नाहीत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.