AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रथिने कमी पडल्यास शरीरावर होतो ‘असा’ परिणाम

भारतासह जगभरात मोठ्या संख्येने लोक प्रथिनांच्या कमतरतेशी झगडत आहेत. अंडी, मांस, डाळी, सोयाबीन यांसारख्या गोष्टी खाल्ल्याने ही पोषक तत्वे मिळतात. जर आपण प्रथिने-आधारित आहार घेणे थांबवले तर त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

प्रथिने कमी पडल्यास शरीरावर होतो 'असा' परिणाम
Protein intake
| Updated on: Jun 05, 2023 | 5:03 PM
Share

मुंबई: प्रथिने हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे, ज्याद्वारे आपले स्नायू तयार होतात, जे शरीराला मजबूत करतात. भारतासह जगभरात मोठ्या संख्येने लोक प्रथिनांच्या कमतरतेशी झगडत आहेत. अंडी, मांस, डाळी, सोयाबीन यांसारख्या गोष्टी खाल्ल्याने ही पोषक तत्वे मिळतात. जर आपण प्रथिने-आधारित आहार घेणे थांबवले तर त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे

  1. प्रथिनांच्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आणि आपण अधिक आजारी पडू लागतो.
  2. जेव्हा शरीरात प्रथिनांची कमतरता असते तेव्हा स्नायू आपल्या हाडांमधून प्रथिने शोषून घेण्यास सुरवात करतात, ज्यामुळे हाडांमध्ये अशक्तपणा येतो.
  3. प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत झाल्यामुळे आपल्या शरीरात वेदना होतात.
  4. मुलांच्या विकासासाठी प्रथिने आवश्यक असतात, हे पोषक तत्व उपलब्ध नसेल तर त्याचा परिणाम एकूण वाढीवर होतो.
  5. जर तुम्हाला पूर्ण झोप घेतल्यानंतर आणि भरपूर अन्न खाल्ल्यानंतर शरीरात थकवा जाणवत असेल तर तुम्हाला प्रथिनांच्या कमतरतेचा सामना नक्कीच करावा लागत आहे.
  6. प्रथिनांच्या कमतरतेमुळे आपलं शरीर अचानक फुलायला लागतं, याचं कारण म्हणजे शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी जास्त दबाव आणावा लागतो.
  7. प्रथिनांच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला नवीन पेशी तयार करण्यात अडचणींना सामोरे जावे लागते, तसेच बरे होण्यासही वेळ लागतो.
  8. प्रथिनांची कमतरता हे चेहऱ्यावर आणि त्वचेवर जळजळ होण्याचं कारण आहे, पोटात जळजळ होण्यासही कारणीभूत आहे.
  9. प्रथिने आपल्या केसांसाठी आवश्यक असतात, जर ते नसेल तर आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात, तसेच केस गळण्याची समस्यादेखील उद्भवते.
  10. आपल्या नखांच्या आरोग्यासाठी देखील प्रथिने खूप महत्वाची आहेत. जर हे पोषक तत्वे उपलब्ध नसतील तर नखांमध्ये इन्फेक्शन होऊन नखे तुटण्याचा धोका असतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.