AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: किडनीचे आरोग्य जपण्यासाठी अवश्य करा ‘या’ गोष्टी

किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. तो निरोगी राखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

Health: किडनीचे आरोग्य जपण्यासाठी अवश्य करा 'या' गोष्टी
किडनी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 11, 2022 | 7:07 PM
Share

मुंबई, किडनी हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये समस्या आल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच किडनीशी (kidney Health Tips) संबंधित गंभीर आजारांना समोर जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किडनीचे मुख्य काम रक्त शुद्ध करणे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, मूत्रपिंडाचे मुख्य काम रक्तातून पाणी आणि सोडियम वेगळे करणे आहे.  या व्यतिरिक्त, मूत्रपिंड म्हणजेच किडनी रेनिन एंजाइम तयार करते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. चुकीच्या आहारामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कंबर आणि पोटातही वेदना होतात. यासोबतच लघवीलाही त्रास होतो. यासाठी किडनी निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही किडनी निरोगी ठेवायची असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा

पेनकिलर घेऊ नका

औषधाच्या अतिसेवनाने किडनीवर वाईट परिणाम होतो. सामान्य डोकेदुखी आणि थकवा आल्यावर लोकं  वेदनाशामक औषधांचे सेवन करतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. हे अजिबात करू नका. जगरज नसेल तर औषध अजिबात घेऊ नका. त्याऐवजी घरगुती उपाय करू शकता.

व्यायाम करा

आरोग्य तज्ञ नेहमी निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देतात. तसेच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच चयापचय देखील वाढतो.

भरपूर पाणी प्या

किडनी निरोगी ठेवायची असेल, तर दररोज पुरेसे पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच शरीर हायड्रेटेड राहते. त्याच वेळी, ते किडनीसाठी देखील फायदेशीर सिद्ध होते. यासाठी दररोज किमान 3 लिटर पाणी प्यावे.

उच्च रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवा

किडनी निरोगी ठेवण्यासाठी उच्च रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पोटॅशियम युक्त अन्नाचे सेवन करा. त्याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि रोजचा व्यायाम आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर साखर आणि मीठ मर्यादित प्रमाणात सेवन करा.

Follow Us
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद