AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला खात्री होती कोट मिळणार… भरत गोगावले यांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट..

रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भरत गोगावले गेल्या काही दिवसांपासून मीच रायगडचा पालकमंत्री होणार असल्याचा दावा करत होते. शेवटी पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनाच मिळाली. आता नुकताच गोगावले यांनी मोठे भाष्य केले.

मला खात्री होती कोट मिळणार... भरत गोगावले यांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट..
Bharat Gogawale
| Updated on: Aug 20, 2026 | 11:33 AM
Share

रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली. गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून होता. शिवसेना शिंदे गट नाशिक आणि रायगड या दोन्ही जागांसाठी आग्रही होती. शेवटी रायगडचे पालकमंत्रीपदावर त्यांना समाधान मानावे लागले. मंत्री भरत गोगावले मीच रायगडचा पालकमंत्री होणार असा दावा करत होते. अनेकदा यावरून वादही रंगला. आदिती तटकरे देखील रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होत्या. शेवटी शिवसेना शिंदे गटाकडे रायगडचे पालकमंत्रीपद गेले. भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला.

नुकताच भरत गोगावले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. गोगावले यांना विचारण्यात आले की, विरोधक तुम्हाला कोट कधी मिळणार बोलत होते काय उत्तर? यावर गोगावले यांनी म्हटले की, ते त्यांचं काम करत होते, आम्ही आमचं; मला खात्री होती कोट मिळणार… कोट कधी मिळणार म्हणणाऱ्यांना उत्तर मिळालं. कालपासून पुन्हा कोट घालायला सुरुवात केली.  भगवानच्या घरात उशीर आहे, अंधेरा नाही, माझा विश्वास खरा ठरला.

धनुष्यबाण चिन्हाबाबत बोलताना भरत गोगावले यांनी म्हटले की, त्यांना आता कल्पना आली असेल की धनुष्यबाण चिन्ह त्यांना मिळणार नाही, ते आमच्याकडेच राहणार आहे… कालपर्यंत ते म्हणत होते की चिन्ह आम्हाला मिळणार, नाव आम्हाला मिळणार, पक्ष आम्हाला मिळणार. आता अचानक चिन्ह गोठवण्याची भाषा सुरू झाली आहे.. याचा अर्थ त्यांना निकालाची दिशा लक्षात आली आहे, म्हणूनच चिन्ह गोठवण्याची मागणी केली जात आहे.

पालकमंत्रीपदाची जबाबदारबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, मुंबई-गोवा महामार्गाचं काम हे आमचं पहिलं प्राधान्य असेल. रायगडच्या विकासासाठी पायाभूत सुविधांना विशेष महत्त्व देणार. रोजगार आणि स्थानिकांना कामाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. जिल्ह्यातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन, जे शक्य आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार.

Follow Us
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले