भारताने ज्याच्यावर ठेवला विश्वास तोच मित्र निघाला खरा शत्रू, थेट मोठी धमकी, सप्टेंबरपर्यंत..

बांगलादेश आणि भारत गंगा जल करार मुद्द्यावर समोरासमोर आलेत. सप्टेंबर महिन्यात हा करार संपत आहे. यादरम्यान घडामोडींना प्रचंड वेग आला. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा करार होण्यापूर्वी वाद वाढण्याची शक्यता आहे.

भारताने ज्याच्यावर ठेवला विश्वास तोच मित्र निघाला खरा शत्रू, थेट मोठी धमकी, सप्टेंबरपर्यंत..
Bangladesh Ganges River Water Treaty
| Updated on: May 18, 2026 | 10:02 AM

बांगलादेश आणि भारताचे संबंध चांगले आहेत. मात्र, गंगा जल करार यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या पुढे उभी आहेत. यंदा सप्टेंबर महिन्यात गंगा जल करार संपत आहे. या कराराच्या माध्यमातून गंगा नदीचे पाणी वाटप ठरते. 1996 ला भारत आणि बांगलादेश यांच्यात हा करार झाला. जो संपत आहे. दोन्ही देशांनी पुन्हा नवा करार करण्याकरिता तयारी सुरू केली. यादरम्यानच भारत कराराकरिता नवा फॉर्मुलाच्या तयारीत आहे. ज्याला बांगलादेशाने विरोध करत थेट तर्कहीन म्हटले. बांगलादेशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारताकडून जो मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे करार होण्यास विलंब होऊ शकतो किंवा करारच संकटात येऊ शकतो. फखरूल इस्लाम आलमगीर यांनी एका कार्यकर्मात यावर भाष्य देखील केले.

फखरूल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले की, आम्ही भारताला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, बांगलादेशातील लोकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या गरजा यानुसार चर्चा व्हायला हवी. नवीन गंगा जल करार तात्काळ लागू करायला हवा. बांगलादेश संसाधन मंत्री शाहिद उद्दिन चाैधरी एनी यांनी बीबीसी बांगलाला बोलताना म्हटले की, सरकारकडून या प्रकरणात एक समिती तयार करण्यात आली.

आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की, दोन्ही देशातील तज्ज्ञ यावर चर्चा करतील आणि मार्ग काढतील. या गंगा जल करारच्या माध्यमातून दोन्ही देशातील मतभेद थेटपणे पुढे येत आहेत. भारताला जुना गंगा जल करारचा फॉर्मुला मान्य नाही. भारताकडे नवा प्लॅन आहे. यादरम्यानच बांगलादेशकडून सीमेजवळ एक धरण बांधले जात आहे, तसे त्यांची प्लॅनिंग आहे. मात्र, याकरिता बांगलादेशने थेट चीनची मदत मागितली.

हीच गोष्ट भारताला अजिबात आवडली नाही. कारण चीनचा त्या क्षेत्रात प्रवेश म्हणजे भारताच्या सुरक्षेला धक्का मानला जातो. धक्कादायक म्हणजे बांगलादेशाला चीनने मदत करण्याचे वचन दिले. ज्यामुळे आता गंगा जल करारात भारत बांगलादेशाचे काहीही ऐकणार नाही, हे तर स्पष्टच आहे. भारत आपल्या मुद्द्यावर ठाम राहणार असल्याची सध्या स्थिती बघायला मिळते. मात्र, बांगलादेशाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यातून लवकराच लवकर मार्ग काढायचा आहे.

Follow Us