AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनच्या नादी लागून बांगलादेश करतोय वाटोळे, थेट भारताला इशारा, गंगा नदीच्या..

बांगलादेशच्या मदतीला भारत कायमच धावून गेला. मात्र, बांगलादेशने पाकिस्तानचे पाय धरल्यापासून भारतानेही सावध भूमिका घेतली. गंगा नदीच्या जल कराराहून भारत आणि बांगलादेश समोरासमोर आहेत. यादरम्यानच भारतावर काही आरोपही केले जात आहेत.

चीनच्या नादी लागून बांगलादेश करतोय वाटोळे, थेट भारताला इशारा, गंगा नदीच्या..
Tarique Rahman
| Updated on: May 17, 2026 | 1:25 PM
Share

बांगलादेशला कायमच भारताने साथ दिली. ज्या ज्या वेळी बांगलादेश संकटात आला, त्यावेळी भारताने मागचे पुढचे सर्व विसरून बांगलादेशची मदत केली. काही दिवसांपूर्वीच एलपीजी गॅसचे मोठे संकट बांगलादेशावर होते. त्यावेळी भारताने थेट कोणताही विचार न करता त्यांना गॅस दिला. मात्र, बांगलादेशला काही गोष्टींचा चांगलाच विसर पडल्याचे बघायला मिळतंय. भारताने केलेले उपकार विसरून त्यांनी थेट चीनचे पाय धरले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीस्ता नदीनंतर आता गंगा नदीच्या पाणी वाटपावरून हालचाली वाढल्या आहेत. बांगलादेशातील सत्तारूढ पार्टी बांगलादेश नॅशनल पार्टीने शनिवारी स्पष्ट केले की, भारतासोबच ढाकाचे भविष्य गंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. बांगलादेशाने मागणी केली की, भारताने ताबडतोब गंगा नदीच्या जल करारावर पुढे येऊन चर्चा करावी आणि करार करावा.

भारत आणि बांगलादेश यांच्यात 1996 साली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात 30 वर्षांकरिता गंगा नदी जल करार करण्यात आला होता. हा ऐतिहासिक करार 2026 मध्ये संपत आहे. ढाका येथील कार्यक्रमात बोलताना बांगलादेश नॅशनल पार्टीचे महासचिव आणि ग्रामीण विकास मंत्री मिर्जा फखरूल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले की, भारतासोबत चांगले संबंध आता गंगा नदीच्या जल करारावर अवलंबून आहेत.

जोपर्यंत हा करार होत नाही, तोपर्यंत भविष्यातील संबंध ठरवणे कठीण आहे. त्यावरच भविष्य आधारित असेल. गंगा नदीचा करार होण्यापूर्वीच मोठ्या धरणाची मंजूरी बांगलादेशने दिली आहे. या धरणाकरिता त्यांनी चीनची मदत मागितली. गंगा नदीचे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये बांगलादेशला हवे आहे. बांगलादेश भारताविरोधात निर्णय घेताना दिसत आहे.  भारताच्या चपाई नवाबगंजच्या रस्त्याने गंगा नदी पुढे बांगलादेशात प्रवेश करते.

गंगा नदीला बांगलादेशात पद्मा नदी म्हटले जाते. गंगा नदीच्या पाण्यावर बांगलादेश मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. बांगलादेशात एकूण 54 नद्या अशा आहेत, ज्या भारतातून बांगलादेशात जातात. गंगा नदीवर बांगलादेश धरण बांधत आहे. हे धरण 2033 मध्ये पूर्ण होईल. यादरम्यानच भारतावर काही आरोपही बांगलादेशातून होत आहेत. गंगा नदीच्या पाण्याबद्दल भारताकडून तशी अजून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आली नाही.

Follow Us
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार