मुस्लिम राष्ट्रांनी रचला भारताविरोधात थेट कट, हादरवणारा निर्णय, एक नव्हे तर तब्बल..

पाकिस्तानने भारताला धक्का देण्यासाठी मोठा निर्णय घेतला. या निर्णयाने खळबळ उडाली. यासोबतच भारताबद्दल चुकीचा दावा केला जात आहे. भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्याचे दिसतंय. पाकिस्तानचा बुरखा भारताने फाटलाय.

मुस्लिम राष्ट्रांनी रचला भारताविरोधात थेट कट, हादरवणारा निर्णय, एक नव्हे तर तब्बल..
Pakistan Agreement
| Updated on: Aug 08, 2026 | 10:49 AM

पाकिस्तान, साैदी अरेबिया आणि तुर्की या तीन देशांनी मोठा निर्णय घेतला. ज्याने भारताला धक्का बसला. भारताविरोधात मुस्लिम देश एकत्र येताना दिसत आहेत. पाकिस्तानने हा संरक्षण करार घडवून आणला. नुकताच या तिन्ही देशांनी मोठा करार केला. पाकिस्तानला चांगल्याप्रकारे माहिती आहे की, भविष्यात तो कधीच भारतासोबत युद्ध लढू शकत नाही. भारताच्या लष्करी ताकदीपुढे त्यांना टिकणे शक्य नाही. मुस्लिम देशांकडून इस्लामिक नाटो तयार करण्यात आले. यादरम्यानच असा एक दावा केला जात आहे की, मुस्लिम इस्लामिक नाटो देशांकडून तयार करण्यात आलेल्या नाटोनंतर भारतानेही घाबरून मोठा निर्णय घेतला. भारत आणि इस्त्रायल देखील संरक्षणासंदर्भात मोठा करार करत आहेत. या दाव्यावर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे स्पष्टीकरण दिले. ही खोटी बातमी तुर्किकडून पसरवण्यात आली. या रिपोर्टमध्ये पाकिस्तानी सुत्रांचा हवाला देण्यात आला.

पाकिस्तान, साैदी अरेबिया आणि तुर्की यांच्यातील करारानंतर भारताने इस्त्रायलकडे संरक्षण करार सादर केला. भारताची इच्छा आहे की, इस्त्रायलने त्यांच्यासोबत संरक्षण करार करावा. ज्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फॅक्ट चेक विंगने सोशल मिडिया प्लेटफॉर्म एक्सवर तुर्कीच्या मीडियाचा एक रिपोर्ट शेअर केला.

ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांनी त्याच स्पष्ट केले. मंत्रालयाने इशारा देत म्हटले की, आम्ही सोशल मीडियावर अशाप्रकारच्या फेक पोस्टपासून दूर राहण्याचे आवाहन करतो. ज्यात खोटा कंटेंट लिहून एआयची मदत घेऊन तयार करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण पाकिस्तान, साैदी अरेबिया आणि तुर्की यांच्याकडून करण्यात आलेल्या मक्का जाईंट डिफेंस एग्रीमेंटवर सह्या झाल्यानंतर काही तासाताच केले. तीन देश एकत्र आल्याने भारताला कुठे ना कुठे धक्का बसलाय.

पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा करार तिन्ही देशांच्या सामुहिक सुरक्षा, लष्कर मदत अधिक मजबूत करण्यासाठी आहे. या कराराचा सर्वात मोठा अर्थ स्पष्ट आहे की, तिन्ही देशांपैकी कोणताही एका देशावर झालेला हल्ला तीन देशांवर झाल्याचे समजले जाईल. याला मुस्लिम देशांचे इस्लामिक नाटो देखील म्हटले जाऊ शकते. परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, या तीन देशांच्या करारावर भारताचे बारीक लक्ष आहे.

यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळतंय. दोन्ही देशातील पंतप्रधानांनी रणनीती अधिक मजबूत करण्यावर भाष्य केले. पाकिस्तानची पूर्ण वाट लागली आहे. मात्र, तरीही त्यांना भारताविरोधात कारस्थान पाकिस्तान करताना दिसत आहे. इस्लामिक नाटोसाठी गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आग्रही होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us