Nepal Flood: अख्खं मार्केट वाहून गेलं, फक्त प्रेतं वाहून येत होती… नुसता मृतदेहांचा खच, प्रत्यक्षदर्शीने जे सांगितलं त्याने सर्वच हादरले
Nepal Flood: नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. एका प्रत्यकदर्शीने जे काही सांगितले ते ऐकून सर्वजण हादरले आहेत. हे लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका डोंगरावर गेले.

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी गावेच्या गावे वाहून गेली आहेत. तर काही ठिकाणी बाजार पेठा वाहून गेल्या आहेत. आतापर्यंत 165 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. एक हजाराहून अधिक लोक बेपत्ता आहेत. यात ३०० हून अधिक भारतीय समाविष्ट आहेत. नेपाळमधील पुराच्या परिस्थितीत तेथील लोकांच्या कहाण्या ऐकून हृदय हेलावून टाकले आहे.
त्रिशूली रिव्हर पॉईंटपासून सुमारे ३२ किलोमीटर दूर बैरेनीमध्ये जिथे संपूर्ण हाईवेवर महापूर आला, तिथल्या लोकांचे म्हणणे आहे की याआधी असे कधीच झाले नाही. कारण इथे आसपास कोणतीही नदीही नाही. लोकांनी सांगितले की घरे आणि दुकानांमध्ये महापुराचा मलबा घुसला. महापूरामुळे सगळे काही वाहून गेले आहे. लोकांनी सांगितले की मलबा ज्या मार्गाने आला, त्याच मार्गाने परतही गेला. आपत्तीनंतर बुलडोझरने हायवेच्या मध्यभागातून मलबा हटवण्यात येत आहे.
प्रेते वाहून येत होती – पूरग्रस्त
पूरग्रस्तांनी सांगितले की वरून पाण्याचा प्रवाह येत होता. या पाण्यात अनेक प्रेते वाहून येत होती. गाड्या वाहत होत्या. आम्ही डोंगरावर गेलो होतो. म्हणून वाचलो. प्राणी इथेच सोडून गेलो होतो, बहुतेक वाहून गेले. एका व्यक्तीने सांगितले की असे यापूर्वी कधीच पाहिले नाही. लोक म्हणत आहेत की चीनचा डॅम फुटला म्हणून असे झाले. महापूर खूप जास्त होता, लोक पळत होते. प्राण जात होते.
एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, ‘‘घरे वाहून गेली आहेत. इथे सर्व पूल वाहून गेले, त्रिशूली बाजाराजवळ ४० पूल वाहून गेले. त्रिशूली बाजार वाहून गेला, देवी घाटही वाहून गेला. शाळाही होती, तीही वाहून गेली. देवी घाटात पुढे रस्ताच नाही.’’ पूरग्रस्त एकाने म्हटले की कधी असे पाहिले नाही. हाईवे पूर्ण वाहून गेला. त्रिशूली हाईवे पूर्ण बंद आहे.
नेपाळमध्ये पूर कसा आला?
चीन-नेपाळ सीमेवरील रसुवागढीजवळ असलेल्या तिमुरे येथे सर्वप्रथम पुराचा तडाखा बसला. रसुवागढीपासून सुमारे २० किलोमीटर वरच्या बाजूस झालेल्या हिमस्खलनामुळे ल्हेंडे नदीचा प्रवाह अडवला गेला, ज्यामुळे पूर आला. विनाशनंतर भारताने नेपाळला मदत पाठवली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना फोन केला आणि मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर भारतीय वायुसेना मदत सामग्री घेऊन नेपाळला पोहोचली आहे.