Iran-Israel-US War: भारताकडे 25 दिवस पुरेल इतका कच्चे तेल, गॅसचा साठा; इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर काय होईल?

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध लांबत चाललं आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. याचा भारताच्या कच्चे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर काय परिणाम होणार, ते जाणून घ्या..

Iran-Israel-US War: भारताकडे 25 दिवस पुरेल इतका कच्चे तेल, गॅसचा साठा; इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर काय होईल?
भारताकडे 25 दिवस पुरेल इतका कच्चा तेल, गॅसचा साठा
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 08, 2026 | 11:40 AM

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता सहाव्या दिवशीही कायम आहे. इस्रायलने गुरुवारी तेहरानमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं. तर दुसरीकडे इराणने इस्रायलच्या जेरुसलेम आणि तेल अवीव या शहरांवरील हल्ले वाढवले. या युद्धात इराणमध्ये किमान 1230 जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये 70 आणि इस्रायलमध्ये 12 ते 15 जण ठार झाले आहेत. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात 28 फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलपुरवठा बंद झाला आहे. यामुळे भारत इतर देशातील महत्त्वाच्या तेल उत्पादक आणि व्यापाऱ्यांकडून तेल खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. होर्मुझची सामुद्रधुनी ही कच्च्या तेलाच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. अरब देशांसोबत भारताच्या तेल आणि गॅसच्या व्यापारासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. इथूनच जगातील 20 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. फक्त इराणच नाही तर सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि कुवैतसारखे देशसुद्धा याच मार्गाने भारताला तेल आणि गॅसचा पुरवठा करतात. देशात पुरेसा साठा असून काळजी करण्याचं कोणतंही...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us