AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालीत अल कायदाचा दहशतवादी हल्ला, 3 भारतीयांचे अपहरण

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अपहरण केलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. सरकारने मालीमध्ये राहणाऱ्या इतर भारतीयांनाही सतर्क राहण्याचे म्हटले आहे.

मालीत अल कायदाचा दहशतवादी हल्ला, 3 भारतीयांचे अपहरण
| Updated on: Jul 03, 2025 | 8:11 AM
Share

पश्चिम आफ्रिकन देश मालीमधील कायेस शहरात अल कायदाने भीषण दहशतवादी हल्ला केला आहे. येथील डायमंड सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे अल कायद्याच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले. यामुळे भारत सरकार चिंतेत आहे. भारत सरकारने भारतीय नागरिकांची तात्काळ आणि सुरक्षित सुटका करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आवाहन माली सरकारला केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १ जुलै रोजी ही घटना घडली.

जेएनआयएमकडून अपहरण

मंगळवारी काही सशस्त्र हल्लेखोरांनी मालीतील कायेस येथील डायमंड सिमेंट कारखान्यावर हल्ला केला आणि तेथे काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे अपहरण केले. अल-कायदाशी संबंधित गट जमात नुसरत अल-इस्लाम वाल मुस्लिमीन (जेएनआयएम) ने मालीमधील या अपहरण आणि इतर हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

भारताचे माली सरकारला आवाहन

मालीची राजधानी बामाको येथील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन आणि सिमेंट कारखाना व्यवस्थापनाशी सतत संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच अपहरण केलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांनाही परिस्थितीची माहिती दिली जात आहे. भारत सरकारने या घटनेला हिंसाचाराचे अत्यंत निंदनीय कृत्य म्हटले आहे. तसेच माली सरकारला भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अपहरण केलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. सरकारने मालीमध्ये राहणाऱ्या इतर भारतीयांनाही सतर्क राहण्याचे म्हटले आहे. तसेच या भारतीयांना भारतीय दूतावासाच्या नियमित संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे.

मालीच्या पश्चिम भागात लष्करी आणि सरकारी प्रतिष्ठानांवर मंगळवारी दहशतवादी हल्ले झाले. त्याच दिवशी अपहरणाची घटना घडली. इस्लामी बंडखोरी आणि तुआरेग बंडखोरीमुळे २०१२ पासून माली अस्थिर बनला आहे. अलिकडच्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

इथून पुढे महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढणार? नेमकं कारण काय?
इथून पुढे महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढणार? नेमकं कारण काय?.
संघामुळे भाजपला 'अच्छे दिन', मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
संघामुळे भाजपला 'अच्छे दिन', मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार पुन्हा सभागृहात जाणार? मविआची रणनीती
उद्धव ठाकरे आणि शरद पवार पुन्हा सभागृहात जाणार? मविआची रणनीती.
ZP Election : सोलापूरच्या स्वराज्य बार ढाब्यात EVM मशीन
ZP Election : सोलापूरच्या स्वराज्य बार ढाब्यात EVM मशीन.
संघाच्या मंचावर सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी! विरोधकांकडून टीकेची झोड
संघाच्या मंचावर सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी! विरोधकांकडून टीकेची झोड.
मंगळसूत्र काढा, मगच परीक्षेला आत सोडणार! संभाजीनगरात धक्कादायक प्रकार
मंगळसूत्र काढा, मगच परीक्षेला आत सोडणार! संभाजीनगरात धक्कादायक प्रकार.
डिसेंबर महिन्यात जादूटोणा, 40 दिवसात अपघात!
डिसेंबर महिन्यात जादूटोणा, 40 दिवसात अपघात!.
Telangana : तेलंगणात फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, वाद पेटला
Telangana : तेलंगणात फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, वाद पेटला.
संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंच्या 'त्या' हस्तांदोलनाची चर्चा
संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंच्या 'त्या' हस्तांदोलनाची चर्चा.
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.