आनंदाची बातमी! भारताच्या हाती लागला मोठा खजिना, ऑइल इंडियाला मिळाले थेट तेलाचे..

भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारताच्या हाती मोठा खजिना लागला आहे. ज्यामुळे ऊर्जेचे संकट दूर होऊ शकते. ऑइल इंडियाच्या हाती थेट खजिना लागला. ज्यामुळे भारताला आता भविष्यात नो टेन्शन असणार आहे.

आनंदाची बातमी! भारताच्या हाती लागला मोठा खजिना, ऑइल इंडियाला मिळाले थेट तेलाचे..
Oil reserves
| Updated on: Apr 28, 2026 | 12:52 PM

भारताच्या हाती मोठा खजिना लागला आहे. ऑइल इंडियाला हा खजिना मिळाला. ऑइल इंडियाला आफ्रिकेतील लिबियालाच तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा मिळाला. भारत हा ऊर्जेसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. भारतात ऊर्जेची मागणी मोठी आहे. त्यामध्येच मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक रिफायनरीवर हल्ला झाला. ज्यामुळे मोठे नुकसान झाले. हेच नाही तर काही तेल रिफायनरीने उत्पन्न बंद करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारताने विविध उपायांवर काम करण्यास सुरूवात केली. त्यामध्येच ऑइल इंडियाच्या हाती मोठा खजिना सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते, हे भारताचे मोठे यश आहे. कच्चा तेलाची आयात होण्यात मोठे यश मिळेल. भारत ऊर्जेसाठी पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामध्ये हा भारताला एकप्रकारे खजिनाच सापडला आहे.

सध्या एरिया 95/96 ब्लॉकमध्ये अन्वेषण कार्य राबवणाऱ्या संघामध्ये दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा प्रत्येकी 25 टक्के सहभाग आहे. हे क्षेत्र नैऋत्य लिबियातील घादामेस खोऱ्यात आहे. हे एक सुस्थापित हायड्रोकार्बन प्रांत म्हणून सर्वत्र ओळखला जातो. जे त्याच्या महत्त्वपूर्ण तेल आणि वायू साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 6,600 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या ब्लॉकचे संचालन सोनाट्राक इंटरनॅशनल पेट्रोलियम एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन कॉर्पोरेशन करत आहे.

दोन्ही कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकांनुसार, एकूण आठ अन्वेषण विहिरींचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत यापैकी पाच विहिरींचे खोदकाम आधीच झाले. सहाव्या अन्वेषण विहिरीच्या खोदकामामुळे या ब्लॉकमध्ये तेल आणि वायूचा नवीन साठा सापडला आहे. ही एक नवीन माहिती आहे.

अन्वेषण कार्य पुन्हा सुरू झाल्याने सहाव्या अन्वेषण विहिरीच्या खोदकामामुळे तेल आणि वायूचा नवीन साठा सापडला असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे. लिबियाच्या राष्ट्रीय तेल महामंडळाने या ब्लॉकला अतिरिक्त हायड्रोकार्बन साठा म्हणून औपचारिकपणे मान्यता देखील दिली आहे. जागतिक बाजारात तेलाचा मोठा तुटवडा आहे. यासोबतच तेलाच्या किमती अस्थिर आहेत. त्यामध्येच आता मोठा खजिना भारताच्या हाती लागला आहे. हे मोठे यश म्हणावे लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us