Nepal Protests: पशुपतिनाथ मंदिराबद्दल मोठा निर्णय, काठमांडूचे विमानतळ लष्कराच्या ताब्यात, जाणून घ्या नेपाळमधील महत्वाच्या 3 घटना

नेपाळमध्ये मोठा हिंसाचार बघायला मिळाला. सरकारी कार्यालय ते न्यायपालिकांना आंदोलकांनी टार्गेट केले. तरुण पिढी सरकारविरुद्ध भयंकर हिंसक निदर्शने करत आहे. हेच नाही तर आता लष्कराने सूत्रे हातात घेतली आहेत. काही भारतीय नागरिक नेपाळमध्ये अडकून पडले आहेत.

Nepal Protests: पशुपतिनाथ मंदिराबद्दल मोठा निर्णय, काठमांडूचे विमानतळ लष्कराच्या ताब्यात, जाणून घ्या नेपाळमधील महत्वाच्या 3 घटना
Nepal Protests
| Updated on: Sep 10, 2025 | 10:23 AM

नेपाळमध्ये हाहा:कार सुरू आहे. तरुण पिढी सरकारविरुद्ध भयंकर हिंसक निदर्शने करत आहे. पंतप्रधानांच्या घरात घुसून धुमाकूळ घालण्यात आलाय तर काही मंत्र्यांना थेट रस्त्यावर काढून त्यांना जमावाने मोठी मारहाण केली. सध्याच्या स्थितीला नेपाळमधील स्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक नेत्यांनी देश सोडून पळ काढलाय. नेपाळमध्ये परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मोठ्या गदारोळानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. लष्कराने हातात कायदा सुव्यवस्था हातात घेतलीये. हेच नाही तर नेपाळच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताने अलर्ट मोड जारी केलाय. सीमा भागात सुरक्षा वाढवली आहे. नेपाळमधील नागरिकांना शांत राहण्याचे आव्हान केले जातंय. नेपाळमधील सध्याच्या परिस्थितीवर भारतात मोठी बैठक पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील संघर्षात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 500 हून अधिक लोक हे जखमी आहेत. संसदेला निदर्शकांनी आग लावली. अनेक मंत्र्यांच्या घरांना देखील टार्गेट करण्यात आले. या परिस्थितीमध्ये अनेक देशांनी आपल्या नागरिकांना नेपाळमध्ये सध्या जाणे टाळण्यास सांगितले. मंगळवारी तरुणांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाला टार्गेट करत आग लावली.

  1. नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिर या हिंसक निदर्शनानंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हेच नाही तर मंदिराच्या परिसरात लष्कर तैनात करण्यात आलंय. निदर्शक मंदिरालाही टार्गेट करू शकतात, या पार्श्वभूमीवर. यासोबतच इतरही काही मंदिरांची सुरक्षा वाढवली आहे.
  2. पंतप्रधान, राष्ट्रपती कार्यालय यामध्येही निदर्शन करणाऱ्यांनी आग लावली. अनेक सरकारी मालमत्तेचे नुकसान देखील त्यांनी केले. हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधील सर्व विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ लष्कराने ताब्यात घेतले.
  3. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधील जेलमधील कैदी हे पळून गेल्याचे सांगितले जाते. मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनांमुळे, तुरुंगातून मोठ्या प्रमाणात कैदी पळून गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. 900 कैद्यांनी जेलमधून पळ काढला आहे. मात्र, याबद्दल अजून काही माहिती मिळू शकली नाही.