AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर एखाद्या चित्रपटात चूकीची माहिती दाखवली गेल्यास काय करतात, कायद्याच्या आधारे करू शकता तक्रार!…

Complaint of Any Film: अनेकदा चित्रपटांमध्ये जी माहिती दाखवलेली असते, त्या माहितीमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. समाजामध्ये द्वेष , वैर भावना निर्माण होणाऱ्या चित्रपटातील माहिती बद्दल आपण तक्रार देखील करू शकतो.

जर एखाद्या चित्रपटात चूकीची माहिती दाखवली गेल्यास काय करतात, कायद्याच्या आधारे करू शकता तक्रार!...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: File Photo
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 9:09 PM
Share

चित्रपट(Indian Cinema) हा समाज मनाचा आरसा मानला जात असतो परंतु चित्रपटामध्ये अनेकदा जी माहिती दाखवली जाते, त्या माहितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या माहितीवर अनेकदा वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जातात. सध्याच्या दिवसांमध्ये अनेक चित्रपटांबद्दल सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटांमध्ये चित्रित केलेल्या माहितीवर वेगवेगळे वाद देखील होताना दिसत आहेत. याआधी देखील सत्य घटनेवर आधारित (Films On Real Incidents) असलेल्या चित्रपटांवर अनेक चर्चा झाल्या व वाद ही झाला. अशावेळी आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की जर चित्रपटांमध्ये चुकीची माहिती दाखवली गेल्यावर नेमके काय करावे? याबद्दल काही कायदेशीर तरतुदी आहेत का? किंवा कोणता एखादा कायदा आहे का? जर चित्रपटातील एखाद्या सीनबद्दल काही आक्षेप (Content in Films) नोंदवायचा असेल तर अशा वेळी नेमकी तक्रार कोठे करायची? जर तुमच्या मनामध्ये सुद्धा असे अनेक प्रश्न असतील तर आज या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत नियम

चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे आपत्कालीन आणि चुकीच्या माहितीवर आधारित असलेली माहिती यासंदर्भात बातचीत करताना दिल्ली हायकोर्ट चे एडवोकेट प्रेम जोशी यांनी म्हटले की, भारताचे संविधान प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करत असतो परंतु देशांमध्ये सांप्रदायिक तणावाची पार्श्वभूमी पाहता सांप्रदायिक आणि धार्मिक सद्भावना टिकवून ठेवण्यासाठी काही आशयावर बंदी लावली जाते. अशा वेळी समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आशय हटवला जातो. माहिती तंत्रज्ञान कायदा 2011 नुसार, या कायद्याअंतर्गत आपत्ती निर्माण करणारा आशय अश्या सामग्रीचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. जर एखाद्या माहितीमुळे भारताची अखंडता संकटात येणार असेल, समाजामध्ये तेढ, वैर – भावना निर्माण होत असेल तर तसेच देशातील रक्षा, सुरक्षा धोक्यामध्ये येत असेल तर अशा प्रकारचा आशय प्रसारित करू नये, असे देखील सांगण्यात आलेले आहे. चित्रपट हे अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा एक माध्यम मानले गेले आहे. आपणास सांगू इच्छितो की, सार्वजनिक व्यवस्थेमध्ये लोकांच्या भावना आणि परंपरा लोकांचा विश्वास, सन्मान न करणे अश्लिलता, लिंग, हिंसा आणि चुकीची माहिती पसरवणे इत्यादी गोष्टींवर चित्रपटांमध्ये प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख कलम 19(1)(ए) मध्ये देखील करण्यात आलेला आहे.

सिनेमॅटोग्राफी कायदा 1988 कलम 8 आणि नियम अकराच्या अंतर्गत वेगळे नियम तयार करण्यात आलेले आहे. बोर्डाने या चित्रपटाला मान्यता देण्याआधी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची वैर भावना निर्माण होणार नाही त्याचबरोबर समाजाचे हित लक्षात घेऊन चित्रपटाला मान्यता द्यायला हवी.

अशाप्रकारे करू शकता तक्रार

चुकीचा आशय आणि आक्षेपार्ह कशाबद्दल तुम्ही तक्रार करू शकता. अ‌ॅडवोकेट जोशी यांच्या मते जर तुम्हाला एखाद्या चित्रपटातील असे आक्षेपार्ह वाटल्यास व चित्रपटाला प्रमाण पत्र मिळून सुद्धा अशावेळी तुम्ही सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे याबद्दल तक्रार करू शकता याशिवाय भारत सरकार च्या CPGRAMS लोक तक्रार पोर्टल वर देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता.आयपीसी,1860 नुसार चुकीची माहिती आणि दृश्य प्रसार ,माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 व कोड ऑफ सिविल प्रोसिजर अंतर्गत तुम्ही आक्षेपार्ह माहितीबद्दल तक्रार करू शकता.

इतर बातम्या :

जपानचे पंतप्रधान Fumio Kishida आणि Pm Modi यांची मोठी घोषणा, भारतात 3.2 लाख कोटी गुंतवणार

‘हिंदूहृदयसम्राट ऐवजी शिवसेनेनं जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं’, MIM च्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.