बालमजुरी विरोधात 7 वर्षात तब्बल 2620 गुन्हे, 1039 मुलांची सुटका

मुंबई पोलिसांकडून 2013 ते मे 2019 या कालावधीत बालमजूर ठेवणाऱ्या लोकांविरोधात 2620 गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या 7 वर्षाच्या कालावधीतील हा आकडा पाहून आपल्या देशात अजूनही बालमजुरीच्या प्रमाणात घट झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बालमजुरी विरोधात 7 वर्षात तब्बल 2620 गुन्हे, 1039 मुलांची सुटका
Follow us
| Updated on: Aug 11, 2019 | 9:28 AM

मुंबई : मुंबई पोलिसांकडून 2013 ते मे 2019 या कालावधीत बालमजूर ठेवणाऱ्या लोकांविरोधात 2620 गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या 7 वर्षाच्या कालावधीतील हा आकडा पाहून आपल्या देशात अजूनही बालमजुरीच्या प्रमाणात घट झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. ही माहिती माहिती अधिकार कायद्यान्वे (RTI) समोर आली आहे.

देशात बालमजुरी करणे गुन्हा आहे. पण तरीही काही ठिकाणी लोक बालमजूर ठेवत लहान मुलांचे भविष्य उद्धवस्त करतात. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बालमजूर ठेवणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत 1039 मुलांची सुटका केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली.

2013 मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण 174 खटले दाखल झाले त्यातील 72 मुलांची सुटका करण्यात आली होती. तर 2014 मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण 441 खटले दाखल झाले होते यात 124 मुलांची सुटका केली होती. विशेष म्हणजे 2015 मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात वाढ होऊन 718 खटले दाखल करण्यात आले त्यातील 457 मुलांची सुटका करण्यात आली होती.

2016 मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात 535 खटले दाखल करण्यात आले त्यातील 165 मुलांची सुटका केली होती. 2017 मध्येही बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण 486 खटले दाखल झाले होते. यामध्ये 138 मुलांची सुटका केली होती. तर 2018 मध्ये एकूण 223 खटले दाखल झाले होते आणि 31 मुलांना सोडवण्यात आले. तर यंदा मे 2019 पर्यंत बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण 43 खटले दाखल झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत 34 मुलांना सोडविण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.