विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर; कपिल सिब्बलांचा पुन्हा एकदा घरचा आहेर

| Updated on: Nov 22, 2020 | 3:58 PM

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर असल्याचे वक्तव्य करुन सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर; कपिल सिब्बलांचा पुन्हा एकदा घरचा आहेर
Follow us on

नवी दिल्ली : अलिकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे (Congress) एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील (Bihar Election) पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही, असे मत व्यक्त करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेमधील अनेक नेत्यांनी टीकादेखील केली. परंतु सिब्बल त्यांच्या मतांवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर असल्याचे वक्तव्य करुन सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. (as aopposition party congress is weak, Kapil sibal slam congress once again)

सिब्बल म्हणाले की, काँग्रेस पक्ष एक प्रभावी विरोधी पक्ष राहिला नाही. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला अध्यक्ष नाही. गेल्या दिड वर्षांपासून पक्ष अध्यक्षाविना काम करतोय. कार्यकर्त्यांची दिशा भरकटतेय, त्यांना माहीत नाही की, नेमकं कुठं जायचं आहे.

सिब्बल म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकींमध्येदेखील कांग्रेस पक्ष मागे पडला. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत तर काँग्रेस पक्ष कुठेच नव्हता. तिथल्या पोटनिवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना अवघी दोन टक्के मते मिळाली आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील या राज्यांमध्ये अनपेक्षित निकाल लागले. गुजरातमधील सर्व जागा आम्ही गमावल्या. पूर्वी ते मतदारसंघ आमच्याकडे होते, परंतु आमचे नेते भाजपमध्ये गेल्यानंतर त्या जागा रिकाम्याच आहेत.

काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या ‘लेटर बॉम्ब’वरून बराच गदारोळ माजला होता. यानंतर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली होती.

मुळात आपली घसरण होत आहे, ही बाब काँग्रेसने सर्वप्रथम स्वीकारायला पाहिजे. आपले कुठे चुकतेय, हे काँग्रेसला पक्के ठाऊक आहे. मात्र, त्याबाबत कोणीही जाहीर वाच्यता करायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहील, अशी भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

मल्लिकार्जुन खर्गे यांचाही कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा, काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप

कपिल सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशोक गेहलोतांची ट्विटची सरबत्ती

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये घमासान, अधीर रंजन चौधरींचं कपिल सिब्बल यांना जोरदार प्रत्युत्तर

(as aopposition party congress is weak, Kapil sibal slam congress once again)