PHOTO : शतक महोत्सवी चिंतामणीचा फर्स्ट लूक

| Updated on: Aug 25, 2019 | 2:54 PM

चिंतामणीचं 100 वं वर्ष असल्याने लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातील चिंतामणीच्या कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.

1 / 7
अवघ्या 21 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे.

अवघ्या 21 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे.

2 / 7
मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चिंचपोकळीचा चिंतामणी हे गणेशोत्सव मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरं करत आहे.

मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चिंचपोकळीचा चिंतामणी हे गणेशोत्सव मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरं करत आहे.

3 / 7
आज म्हणजे 11 ऑगस्टला चिंतामणीचा आगमन सोहळा आयोजित केला आहे.   यंदा या चिंतामणीचं 100 वं वर्ष असल्याने लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातील चिंतामणीच्या कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.

आज म्हणजे 11 ऑगस्टला चिंतामणीचा आगमन सोहळा आयोजित केला आहे. यंदा या चिंतामणीचं 100 वं वर्ष असल्याने लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातील चिंतामणीच्या कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.

4 / 7
चिंचपोकळीचा पूल धोकादायक घोषित केल्याने हा आगमन सोहळा लालबागच्या गणेश टॉकिजपासून सुरु होणार आहे. त्यानंतर पुढे श्रॉफ बिल्डिंगपासून, तांबावाला बिल्डींग ते चिंतामणी मंडप असा हा आगमन सोहळा असणार आहे.

चिंचपोकळीचा पूल धोकादायक घोषित केल्याने हा आगमन सोहळा लालबागच्या गणेश टॉकिजपासून सुरु होणार आहे. त्यानंतर पुढे श्रॉफ बिल्डिंगपासून, तांबावाला बिल्डींग ते चिंतामणी मंडप असा हा आगमन सोहळा असणार आहे.

5 / 7
चिंतामणीचं शतक महोत्सवी वर्ष असल्याने आगमन सोहळ्याला मुंबईकर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

चिंतामणीचं शतक महोत्सवी वर्ष असल्याने आगमन सोहळ्याला मुंबईकर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

6 / 7
दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत चिंतामणीचं आगमन होत असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत चिंतामणीचं आगमन होत असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

7 / 7
चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत यंदा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 5 लाख रुपयांची मदत करण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय या आगमन सोहळ्यादरम्यान ठिकठिकाणी दानपेट्या ठेवण्यात येणार आहेत. यात जमा होणारा निधी मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत यंदा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 5 लाख रुपयांची मदत करण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय या आगमन सोहळ्यादरम्यान ठिकठिकाणी दानपेट्या ठेवण्यात येणार आहेत. यात जमा होणारा निधी मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे.