AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे आक्रित घडले; भारताची ताकदच आता ठरतेय कमकुवत बाजू: राहुल गांधी

जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) 8.6 टक्के इतका राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेकडून वर्तवण्यात आला होता. | Rahul Gandhi

नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे आक्रित घडले; भारताची ताकदच आता ठरतेय कमकुवत बाजू: राहुल गांधी
| Updated on: Nov 12, 2020 | 11:54 AM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे देशाच्या इतिहासात भारताने प्रथमच मंदीच्या फेऱ्यात प्रवेश केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे भारताची ताकदच आता आपली कमकुवत बाजू झालेय, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. (Rahul Gandhi slams PM Narednra Modi over GDP estimates by RBI)

राहुल गांधी यांनी हे वक्तव्य करताना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीचा दाखला दिला आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) 8.6 टक्के इतका राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेकडून वर्तवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.

रिझर्व्ह बँकेकडून काही दिवसांपूर्वी बुधवारी यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये जुलै-डिसेंबर या तिमाहीत भारताचा विकासदर 8.6 टक्क्यांपेक्षा खाली राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कोरोना संकटामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत उणे विकासदर नोंदवला गेला होता. त्यामुळे देश मंदीच्या फेऱ्यात अडकल्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

(Rahul Gandhi slams PM Narednra Modi over GDP estimates by RBI)

चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीतील विकास दर (जीडीपी) उणे 23.9 टक्क्यांनी खाली आला होता. गेल्यावर्षी 2019-20मध्ये पहिल्या तिमाहीत विकासदर 5.2 टक्के होता. कोरोनामुळे उत्पादन, गृहनिर्माण, खाण, सेवा क्षेत्रात मोठी घसरण झाल्यामुळे ही वेळ ओढावली होती.

दरम्यान, आज मोदी सरकारकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना खास गिफ्ट दिले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार 1.5 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत आहे. सरकारने बुधवारीच देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी आणखी 10 क्षेत्रांना उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) म्हणून 2 लाख कोटी रुपये देण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती.

संबंधित बातम्या:

Nirmala Sitharaman PC : निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद, दिवाळीच्या तोंडावर पॅकेजची घोषणा?

गोरगरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज : निर्मला सीतारमण

मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; सणांसाठी आगाऊ रक्कम आणि LTC कॅश व्हाऊचर्स

(Rahul Gandhi slams PM Narednra Modi over GDP estimates by RBI)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.