औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने देण्यात (marathwada water grid project stop) आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना स्थगिती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली असून या निर्णयला भाजपकडून विरोध दर्शवला जात आहे.
मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी फडणवीस सरकारने वॉटर ग्रीड ही महत्त्वकांक्षी योजना आखली होती. या योजनेचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. या योजनेसाठी अंदाजे 10 हजार कोटी दिले होते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणचं पाणी कोरडवाहू भागात आणण्याची ही योजना होती.
मात्र अजित पवार यांनी या योजनेच्या व्यवहारिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तज्ज्ञांनी या योजनेत योग्य व्यवहार झाला नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे इतर योजनेप्रमाणे ही योजना देखील राज्य सरकार गुंडाळणार असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.
मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि महिलांच्या आरोग्यावर देखील होतो. मराठवाडाची वॉटर ग्रीड योजना व्यवहारिक नसेल, पण ती बंद केल्याने लोकांच्या घशाला कोरड पडेल त्याचं काय? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला (marathwada water grid project stop) आहे.
काय आहे मराठवाडा वॉटर ग्रीड? (What is marathwada water grid project)
प्रस्तावित ग्रीडची ठळक वैशिष्ट्ये
योजनेची सद्यस्थिती
मराठवाड्यातील 10 प्राथमिक संकलन अहवालापैकी 8 जिल्ह्यांसाठी 8 प्राथमिक संकलन अहवाल, तसेच मराठवाड्याकडे इतर खोऱ्यातून पाणी आणण्यासाठी 2 प्राथमिक संकलन अहवाल प्रस्तावित आहेत. त्यापैकी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी 2 पीडीआर मेकोरोटकडून प्राप्त झाले आहेत.
वाचा – दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार
जिल्हा औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यासाठी एकूण किंमत 2 हजार 764 कोटी 46 लक्ष आहे, त्यामध्ये एकूण पाईपलाईन 737 कि.मी. आणि 4 जलशुद्धिकरण केंद्राची एकूण क्षमता 396 दशलक्ष लिटर असेल.
जिल्हा जालना
जालना जिल्ह्यासाठी एकूण किंमत 1 हजार 529 कोटी 08 लक्ष आहे. त्यामध्ये एकूण पाईपलाईन 458 कि.मी. आणि 3 जलशुद्धीकरण केंद्राची एकूण क्षमता 149 दशलक्ष लिटर असेल.
जिल्हा बीड
बीड जिल्ह्यासाठी एकूण किंमत 4 हजार 801 कोटी 86 लक्ष आहे, त्यामध्ये एकूण पाईप लाईन 1078.61 कि.मी. आणि 5 जलशुद्धीकरण केंद्राची एकूण क्षमता 255 दशलक्ष लिटर प्रस्तावित आहे.
या कामाचं नियोजन, अंमलबजावणी, परिचालन व देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात येणार (What is marathwada water grid project) आहे.