AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं.

दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 17, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं. मराठवाड्यातील नेहमीच्या दुष्काळावर मात करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी, समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणून, त्याद्वारे सिंदफना, कुंडलिका, वाण, मनार आणि मांजरा उपखोऱ्यात वळविणेबाबतचे निवदेन पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

कशी असेल प्रस्तावित योजना?

भाग 1- जायकवाडी धरण ते सिंदफना नदी यांना जोडणारा जलदगती प्रवाही कलवा 70 किमी काढणे.

भाग 2- मांजरा, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मासोळी, व मनार प्रकल्पाचे  स्थैर्यकरण करणेसाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपखोऱ्यात वळविणे.

मराठवाडयातील बीड, केज, धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, कंधार, रेणापूर, चाकूर, बिलोली आणि मुखेड तालुक्यात नवीन सिंचन योजना हाती घेता येतील.

प्रस्तावित योजनेसाठी अंदाजे 6700 कोटी खर्च अपेक्षित असून, या योजनेचे सर्वेक्षण तात्काळ करण्याची मागणी  पंकजा मुंडेंनी केली.

जायकवाडी धरण भरलं

आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण यावर्षी 91 टक्के भरलं आहे. उत्तर महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरण भरलं. पण जायकवाडी धारणाखालच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे, जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.

जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धा फुटाने उचलून तब्बल 5700 क्युसेक्सने हा पाण्याचा विसर्ग करणयात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धारणाखाली असलेल्या नदी काठावरील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या 

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग, ड्रोनच्या माध्यमातून पाहा विहंगम दृश्य 

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडलं, अत्यल्प पावसाने अनेक गावात अजूनही टँकरने पाणी 

नाथसागर शंभरीकडे, प्रत्येक मराठवाडावासियाचं मन सुखावणारे फोटो 

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक