AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट

CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी… शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट

| Updated on: Jul 22, 2026 | 2:13 PM
Share

दिल्लीतील जंतरमंतर येथे CJP कॉक्रेज जनता पार्टीकडून NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधले आहे. आंदोलनानंतर केंद्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत.

दिल्लीतील जंतरमंतर येथे CJP कॉक्रेज जनता पार्टीकडून NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधले आहे. आंदोलनानंतर केंद्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. अशात CJP च्या शिष्टमंडळातील सौरव दास यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे.

सौरव दास यांनी माध्यमांशी बोलताना, बैठकीसाठी कोणत्याही राजकीय नेत्याच्या घरी जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. चर्चा करायची असेल तर ती जंतरमंतरवरील आंदोलनस्थळीच व्हावी, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांनी सांगितले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या सर्वांनी प्रत्यक्ष ऐकल्या पाहिजेत. त्यामुळे कोणत्याही बंद दाराआड चर्चा करण्याऐवजी आंदोलनस्थळीच संवाद व्हावा, अशी CJP ची भूमिका आहे.

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशातील राजकारण तापले असून अनेक विरोधी पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत केंद्र सरकार, आंदोलनकर्ते आणि विविध राजकीय नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत बैठक निश्चित झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Jul 22, 2026 02:12 PM

Follow Us
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा