AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

नीट पेपरफुटी प्रकरणावरून संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. विरोधकांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत संसदेचे कामकाज रोखून धरले. जोपर्यंत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत चर्चेस नकार देण्याचा आक्रमक पवित्रा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतला.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली
mallikarjun khargeImage Credit source: संसद टीव्ही
| Updated on: Jul 22, 2026 | 2:42 PM
Share

जंतरमंतरवरील आंदोलनाचे राज्यसभेत जोरदार पडसाद उमटले आहेत. आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नंतरच आम्ही चर्चा करू, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षाने केली. विरोधकांनी केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण सभागृह दणाणून सोडलं. सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने राज्यसभेचं कामकाज आज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. तर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

राज्यसभेचं कामकाज दुपारी सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्ष चर्चेची मागणी करत आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत. नीट परीक्षेवर नियमांप्रमाणे चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं सांगितलं. तर, विरोधी पक्ष बेजबाबदारपणे वागत आहे. हे सरकार पूर्णपणे पारदर्शी सरकार आहे. विरोधी पक्षांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास नाहीये, असा हल्लाच जेपी नड्डा यांनी केला.

खरगे आक्रमक

यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर लीकवर नियम 267 अंतर्गत चर्चा करण्याची मागणी केली. आम्हाला या नियामांतर्गत चर्चा हवी आहे. पण जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही. आधी राजीनामा द्या. त्यानंतरच चर्चा होईल, असा आक्रमक पवित्रा खरगे यांनी घेतला.

राज्यसभेचं कामकाज तहकूब

खरगे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर विरोधकांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत सरकारला धारेवर धरलं. सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. कामकाज करणं अशक्य झालं. त्यामुळे सभाअध्यक्षांनी आजचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. तर दुसरीकडे लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

कल्याण बॅनर्जी सस्पेंड

दरम्यान, लोकसभेत कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत सस्पेंड करण्यात आलं आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनापर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर केला. लोकसभेने तो तात्काळ मंजूर केला.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी