5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको – पंकजा मुंडे

5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य अतिशय सूचक मानलं जात आहे. माझ्या समर्थकांपुढे कोणंतही पद मला मोठं नाही, असंदेखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको - पंकजा मुंडे
| Updated on: Mar 11, 2024 | 9:05 AM

बीड | 11 मार्च 2024 : 5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य अतिशय सूचक मानलं जात आहे. माझ्या समर्थकांपुढे कोणंतही पद मला मोठं नाही, असंदेखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीडमधील सभेत कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, वनवास म्हटलं की पाचचं वर्षांचा असावा या युगात बाबा ! त्या जुन्या काळात होता वनवास 14 वर्षांचा, आम्हाला 5 वर्षंच खूप झाला. का अजून पाहिजे तु्म्हाला ? मग तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत ?

मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहीलं आहे. आत्तापर्यंत जे काही लिहीलं होतं, त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त फार काही मिळालेलं नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार काही बोलत नाही. पण मी फार दु:ख, यातना, वेदना, भोगून झालेल्या आहेत. ते सर्व भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते, नको असतानाही चेहरा हसरा ठेवते ते केवळ तुमच्यामुळे (कार्यकर्त्यांमुळे).. तुम्ही नाही तर मला आयुष्यात काही नाही. खड्ड्यात गेलं ते पद-बिद… मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला चांगला विकास देऊन, सन्मार्ग देऊन, त्या प्रेमाची मी पावती देणार आहे, त्याची परतफेड मी करणार आहे. माझ्याकडून तुम्हाला मान खाली घालावे लागेल असं मी काहीही कृत्य करणार नाही. असे झाले तर तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us