AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगवी आरोग्य केंद्राला छळ केंद्र म्हणून देशात पहिला क्रमांक मिळेल – अनिल गोटे

भाजपासंचलित धुळे जिल्हा परिषदेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे.

सांगवी आरोग्य केंद्राला छळ केंद्र म्हणून देशात पहिला क्रमांक मिळेल - अनिल गोटे
| Edited By: | Updated on: Nov 24, 2020 | 4:23 PM
Share

धुळे : राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आज सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपरवर (Bjp) निशाणा साधला आहे. भाजपासंचलित धुळे जिल्हा परिषदेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. यावेळी आदिवासी भागातील रुग्णालयांची व्यवस्थाही रामभरोसे असल्याचं त्यांनी म्हटलं. (Sangvi Primary Health Center can be number one torment center in the country said by Anil Gote)

‘धुळे जिल्ह्यातील बहुचर्चीत आणि विकासाचा आदर्श म्हणून डांगोरा पिटणाऱ्या शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आदिवासींचा छळ, भ्रष्टाचार, अनागोंदी आणि भोळ्या भाबड्या आदिवासींच्या आरोग्याचे छळ केंद्र म्हणून कदाचित देशात पहिला क्रमांक मिळू शकेल’ असा घणाघाती आरोप अनिल गोटे यांनी केला.

सांगवी आरोग्य केंद्रातील अनागोंदी अवहेलना व निष्पाप अभ्रकांचे मृत्यु या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती यावेळी अनिल गोटे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेत भाजपाची एकछत्री सत्ता आल्यापासून बेकायदेशीर कारभार, अनागोंदी कायदे धाब्यावर बसवून काम करण्याची हुकूमशाही वृत्ती या गोष्टींचा परिणाम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या सर्व विभागांवर झाला असल्याचंही यावेळी अनिल गोटे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘गरीब आदिवासींच्या जीवनाशीचा खेळ खंडोबा मांडला आहे. जी दुरावस्था सांगवीमध्ये आहे, तिच परिस्थिती थोड्या फार फरकाने सर्वत्र आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ठिकाणी महिलांचे अतोनात हाल होतात. मात्र, तरीदेखील संपर्क साधून कोणी याठिकाणी दखल घ्यायला तयार होत नाही. सोयी-सुविधांच्या अभावि अनेकांचा जीवदेखील जातो. त्यामुळे आदिवासी भागातील रुग्णालयाची अवस्था सध्यातरी रामभरोसे दिसून येत आहे.’ असं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या –

Anil Gote on Padalkar | ‘डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही’, अनिल गोटे यांची पडळकरांवर टीका

“फडणवीसांकडून सत्याची अपेक्षा म्हणजे धोत्र्याच्या फुलाकडून गुलाबाची अपेक्षा करणे”

(Sangvi Primary Health Center can be number one torment center in the country said by Anil Gote)

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं