विनोद तावडेंची सेकंड इनिंग; राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणार?

आता विनोद तावडे या नव्या संधीचा कशाप्रकारे फायदा उठवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. | Vinod Tawde in national politics

Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 14, 2020 | 2:58 PM
1 / 8
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर आता भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर आता भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे.

2 / 8

विनोद तावडे यांनाही गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर विनोद तावडे राज्यातील राजकारणापासून काहीसे दूर फेकले गेले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कार्यकारिणीत समावेश करत भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.

3 / 8

अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला, संघाच्या मुशीत घडलेला एक नेता. अत्यंत महत्त्वाकांक्षी, तेवढाच बुद्धिमान आणि धूर्त नेता म्हणून विनोद तावडे यांची ओळख आहे.

4 / 8

विनोद तावडे यांनी 1985 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. यानंतर विनोद तावडे यांनी एकएक पायरी चढत महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

5 / 8

नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या दोन बड्या नेत्यांच्या सावलीत राहून विनोद तावडे यांनी भाजपमध्ये स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले. 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा भाजपच्या वर्तुळात विनोद तावडे यांच्याभोवती प्रचंड वलय होते. मात्र, 2014 पासून विनोद तावडे यांच्याभोवतीचे हे वलय हळूहळू फिकट व्हायला सुरुवात झाली. शिक्षणमंत्री म्हणून त्यांचे अनेक निर्णय आणि वक्तव्ये वादग्रस्त ठरली. इथून त्यांच्या पडझडीचा काळ सुरू झाला.

6 / 8

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना उत्तर मुंबईतला बोरिवली मतदारसंघ तयार मिळाला होता. तिथे गोपाळ शेट्टींसारखे खासदार असल्यामुळे ते सहजपणे तिकडून निवडून आले. पण निवडून आल्यावर तावडे पाच वर्षं त्या मतदारसंघात फिरकलेही नाहीत. 2019 मध्ये भाजपाकडून निवडणूकपूर्व सर्वेक्षण झालं तेव्हा हे सगळेच त्यांच्या विरोधात गेले होते.

7 / 8

8 / 8

त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us