AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टी प्रत्येक माणसाकडे हव्याच, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टी प्रत्येक माणसाकडे हव्याच, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 6:48 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य यांचा राजा धनानंदच्या राज्यात अपमान झाला होता, त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी चाणक्य यांनी आपल्या कुटनीतीच्या जोरावर धनानंदची सत्ता उलथून लावली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य म्हणतात माणसाला त्याच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते, ते गुण जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होतात. परंतु ते गुण जण तुमच्यामध्ये नसतील तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी फार वेळ लागत नाही. तसेच पुढे चाणक्य यांनी असं देखील म्हटलं आहे, की प्रत्येक गोष्टीमधून माणसाने शिकलं पाहिजे, जो माणूस शिकतो तो त्याच्या आयुष्यात पुढे जातो. परंतु जो माणूस एखाद्या गोष्टीमधून धडा घेत नाही, तो मात्र आपल्या आयुष्याची लढाई हरतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात संयम हा असायलाच हवा, ज्याच्या आयुष्यात संयम असतो, तो या जगातील कोणतीही गोष्ट सहज प्राप्त करू शकतो. त्यामुळे आयुष्यात चढ-उतार येतील, काही दुख:चे क्षणही वाट्याला येतील, परंतु अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमचा संयम ढळू देऊ नका. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात संयम ठेवून काम केलं तर एक दिवस नक्कीच तुमचा विजय होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणीही पराभूत करू शकत नाही. मात्र तुम्ही जर कठीण परिस्थितीमध्ये तुमचा संयम गमावला तर मात्र तुमच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे संयम ही एक अशी गोष्ट आहे, जिच्या जोरावर तुम्ही जगातील कोणतीही गोष्ट सहज मिळू शकतात.

कष्ट – चाणक्य म्हणतात कष्ट ही अशी गोष्ट आहे, जी आजपर्यंत कोणालाच चुकली नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टायची तयारी ठेवा, कारण तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त यश तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळेल. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कष्टच केले नाहीत तर मग मात्र तुमच्या अडचणी वाढतील, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.

कृतज्ञता – चाणक्य म्हणतात माणसाने सदैव नम्र असलं पाहिजे, नम्रता हेच बुद्धिवान व्यक्तीचं लक्षणं आहे, तुम्ही जर नम्र असाल तर यश हे तुम्हाला मिळेलच, परंतु काही लोक हे नम्र नसतात. अशा लोकांचं आयुष्य हे अनेकदा संकटात सापडतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट ही नम्रतेनं स्विकारायला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश