आयुर्वेदानुसार, दररोज असे पाणी प्या, 60 व्या वर्षीही तुम्ही 40 चे वाटाल

आयुर्वेदानुसार पाणी हे औषधापेक्षा कमी नाही. जास्तीत जास्त पाणी पिणे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते हे आपल्याला माहित आहे. पण पाणी योग्य प्रकारे पिणेही महत्वाचे आहे. पाणी योग्य पद्धतीने प्यायले तर शरीरातील अर्धे आजार बरे होऊ शकतात आणि माणूस बराच काळ निरोगी राहू शकतो.

आयुर्वेदानुसार, दररोज असे पाणी प्या, 60 व्या वर्षीही तुम्ही 40 चे वाटाल
healthy drinking water
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2025 | 12:38 PM

आपल्या शरीरासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची कदाचित गरज नाही. पण फक्त पाणी पिणे पुरेसे नाही, तर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी पिणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आजकाल बहुतेक लोकांना दिवसातून किती पाणी प्यावे हे माहित आहे परंतु अजूनही अनेक लोकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित नाही. तर आयुर्वेदानुसार, जर पाणी योग्य पद्धतीने प्यायले तर अनेक आजार शरीरापासून दूर राहतात. आता पाणी हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, तर ते पिण्याची योग्य पद्धत का माहित नसावी? चला तर मग आज आपण आयुर्वेदात सांगितलेले पाणी पिण्याचे काही नियम जाणून घेऊया. ज्याचा आपल्या शरीरावर नक्कीच सकारात्मक फायदा होतो.पण वयावरही त्याचा सकारात्मक बदल दिसतो.

नेहमी बसून पाणी प्या
आपण घरातील मोठ्यांकडून अनेकदा ऐकलं असेल की पाणी नेहमी बसून प्यावं, अन्यथा सांधेदुखी होऊ शकते. आयुर्वेदानुसार, उभे राहून कधीही पाणी पिऊ नये. खरंतर, जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा शरीर ते योग्यरित्या शोषू शकत नाही. यामुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. म्हणूनच आरामात बसून पाणी पिणे नेहमीच उचित आहे.

घोट घोट पाणी प्या.
लोक अनेकदा एकाच वेळी भरपूर पाणी पितात किंवा घाईघाईत पिताता. तर आयुर्वेदानुसार ही अजिबात चांगली सवय नाही. आयुर्वेदात जेवताना पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे, चघळत असल्यासारखे घोटभर पाणी प्यावं. पाणी पिण्यासाठी जितका जास्त वेळ घ्याल तितके ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तोंडातील पाणी आणि लाळ चांगले मिसळते, जे पोटासाठी खूप फायदेशीर आहे.

जेवणापूर्वी आणि नंतर लगेच पाणी पिऊ नका
तुम्ही घरातील मोठ्यांकडून हे ऐकले असेलच की जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आयुर्वेदानुसार, असे केल्याने पोटातील अग्नीतत्त्व कमकुवत होतं. हेच अग्नीतत्त्व अन्नाचे विघटन करते आणि ते पचवते. अग्नी कमकुवत झाल्यामुळे पोटफुगी, गॅस, आम्लता आणि पोटदुखी इत्यादी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे.

जास्त थंड पाणी पिऊ नये
आयुर्वेदानुसार, जास्त थंड पाणी पिणे देखील टाळावे. जास्त थंड पाणी पिल्याने बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरमधील थंड पाणी आराम देऊ शकते पण ते आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून, आयुर्वेदानुसार, नेहमी खोलीच्या तपमानावर ठेवलेले पाणी प्यावे. जर खूप गरम असेल तर तुम्ही मातीच्या भांड्यातून थोडे थंड पाणी पिऊ शकता किंवा फ्रिजमधून आणलेल्या थंड पाण्यात थोडेसे सामान्य पाणी मिसळून ते पिऊ शकता.

जर तुम्ही योग्य भांड्यात पाणी साठवले तर तुम्हाला दुप्पट फायदा होईल
आयुर्वेदानुसार, जर पिण्याचे पाणी तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात साठवले तर ते शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. चांदी आणि तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी शरीरातील वात, कफ आणि पित्त दोषांचे संतुलन राखण्यास मदत करते. हे पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पाण्याचे दुप्पट फायदे हवे असतील तर तुम्ही पिण्याचे पाणी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात साठवून ते पिऊ शकता.

 

 

Follow Us