AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे की नाही? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

जेव्हा जेव्हा उष्णतेचे तापमान वाढते तेव्हा आपल्याला फक्त थंड पाणी प्यावेसे वाटते. पण प्रश्न असा पडतो की उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे की नाही? तसेच, त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? अशा आरोग्याशी संबंधीत अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. अशावेळेस या प्रश्नाचे उत्तर आजच्या या लेखातून जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे की नाही? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Water Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Apr 21, 2025 | 2:05 PM
Share

वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येकजण थंड पाणी पित असतो. तसेच थंड फळांचे ज्यूस प्यायल्याने तुम्हाला थोड्या वेळासाठी आराम मिळू शकतो, परंतु जास्त थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नसते. यावर अनेक रिसर्च झाले आहेत, ज्यात असे दिसून आले आहे की कोमट पाणी पिणे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारण्यासोबतच ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास देखील मदत करते. पण उन्हाळ्यात आपण कोमट पाणी पिऊ शकतो का?

असा प्रश्न अनेकांना पडतो. अशातच तुम्ही जेव्हा कडक उन्हातून घरी येता, तेव्हा तुम्ही लगेच थंड पाणी पिऊ नये, त्याऐवजी तुम्ही फक्त सामान्य पाणी प्यावे, त्याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही.

शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते

गरम पाणी तुमच्या शरीरातील घाण नैसर्गिक पद्धतीने काढून टाकण्यास मदत करते. तर थंड पाणी पिण्यामुळे शिरा आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्ताभिसरण मंदावते. जर तुम्ही गरम पाण्याबद्दल बोलायचे झाल्यास तर कोमट पाणी प्यायल्याने तुमच्या आकुंचन झालेल्या शिरा मोकळे होतात. तसेच मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य सुधारते.

आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते

पोट फुगणे किंवा पेटके येणे आणि पचनाच्या समस्या असल्यासही गरम पाणी खूप फायदेशीर आहे. थंड पाणी प्यायल्याने पोटाला किंवा शरीराला आणखीण त्रास होऊ शकतो. गरम पाणी तुमच्या पोटाचे तापमान कमी करते आणि एन्झाईम्सची क्रिया देखील मंदावते.

कोमट पाणी पिताना वेळेची काळजी घ्या

जर तुम्हाला कोमट पाणी पिण्याची सवय असेल तर वेळेची विशेष काळजी घ्या. सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर अर्धा तासाने ते प्या. याचे तुम्हाला तात्काळ फायदे दिसतील. एनसीबीआयच्या एका संशोधनानुसार, कोमट पाणी पिणे आतडे सुधारण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

चांगले चयापचय

काही संशोधनातून असे दिसून आले आहे की गरम पाणी पिल्याने चयापचय वाढू शकतो आणि वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

ताणतणाव कमी करणे

तुम्ही जर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायले तर तुमचा ताण आणि चिंता काही प्रमाणात कमी होते. कोमट पाणी प्यायल्याने सूज कमी होण्यास, स्नायूंना आराम मिळण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच कोमट पाणी प्यायल्याने ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारे पेटक्यांचा त्रास कमी करण्यास आणि डोकेदुखी आणि मायग्रेन कमी करण्यास देखील मदत करू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...