डाग आणि मुरुमांसारख्या त्वचेवर रामबाण उपाय, कोणताच खर्च न करता कशी होईल मऊ त्वचा?
सध्याचं वातावरण पाहता अनेस समस्या समोर उभ्या राहतात. त्यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे डाग आणि मुरम असलेली त्वचा. पण घराच काही उपाय केल्यानंतर तुम्हाला मऊ त्वचा मिळेल...

आजचं वातावरण आणि धकाधकीचं आयुष्य पाहिल्यानंतर स्वतःकडे लक्ष देणं फार कठीण होतं… ऑफिस, कामाचा ताण, घर, कुटुंबातील जबाबदारी…, रोजचा प्रवास… अशा अनेक कारणामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळतच नाही. अशाच चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. यावर उपचार म्हणून फक्त महिलाचं नाही तर, पुरुष देखील महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कोणताच खर्च न करता तुमची त्वचा मऊ होईल… घरगुती एक उपाय केल्याने निस्तेज त्वचा उजळून दिसेल… तर तुम्हाला देखील प्रश्न पडला आसेल की, नेमका उपाय काय… यावर उपाय आहे तांदळाचं पाणी… सांगायचं झालं तर, तांदळामध्ये फेरुलिक ॲसिडसह काही वनस्पतीजन्य संयुगे आणि पोषक तत्वे असतात, जी त्वचा ओलसर आणि मऊ ठेवण्यास मदत करतात.
डाग, मुरुमे किंवा त्वचेच्या इतर समस्यांवर तांदळाचं पाणी हा एक खात्रीशीर उपाय आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. पण, काही लोक त्यांच्या त्वचेच्या काळजीच्या नित्यक्रमाचा भाग म्हणून याचा वापर करतात.
तांदळाच्या पाण्याचा तुम्ही टोनर म्हणून वापर करु शकता. तुम्ही तांदूळ थोड्या पाण्यात भिजवून ते पाणी गाळून घेऊ शकता. तुम्ही त्यात थोडे कोरफडीचा गर किंवा गुलाबजल घालून ते चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमची त्वचा ताजीतवानी दिसेल. पण आधी हाताच्या लहान भागावर याचा प्रयोग करून पाहणे अधिक चांगलं ठरेल.
तोंडाचा मास्क म्हणून देखील वापरु शकता. शिजवलेला भात गाळून झाल्यावर, उरलेलं पाणी थंड करा, त्यात थोडं मध घाला आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 10 – 15 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. ज्यांची त्वचा नाजूक आहे त्यांनी लिंबाचा रस लावणं टाळावं.
तांदळाच्या पाण्याचा बर्फाचा तुकडा देखील उपयोगी ठरु शकतो. अन्य एक पद्धत म्हणजे तांदळाचं पाणी आईस ट्रेमध्ये गोठवून ते हळुवारपणे चेहऱ्यावर लावणं. थंडीमुळे काही काळासाठी सूज कमी होण्यास मदत होऊ शकतं. मात्र, बर्फ जास्त वेळ थेट त्वचेवर ठेवू नका.
काही लोक उन्हामुळे भाजलेल्या त्वचेवर तांदळाचे पाणी, काकडीचा रस आणि कोरफडीचा गर यांचं मिश्रण वापरतात. पण, जर तुम्हाला तीव्र जळजळ, वेदना किंवा फोड येत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम ठरेल. सांगायचं झालं, तांदळाचं पाणी त्वचेच्या काळजीसाठी एक साधा घरगुती उपाय म्हणून वापरलं जाऊ शकतं, परंतु त्वचेच्या कोणत्याही समस्येवर तो रामबाण उपाय आहे असं मानू नये. अधिक त्रास होत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.