
आजकाल शहरांमध्ये कंटेनर गार्डनिंगचा ट्रेंड अधिकच वाढलेला आहे. आपल्यापैकी अनेकांना गार्डनिंग करायला खूप आवडते. तर कंटेनी गार्डनिंग म्हणजेच कुंड्यांमध्ये रोपं लावण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे बरेच लोकं त्यांच्या बाल्कनी आणि टेरेसवर कुंड्यांमध्ये फुले, भाज्या आणि अगदी फळे देखील वाढवत आहेत. जर तुम्हाला तुमची बाग फुलांनी फुललेली आणि सुंदर दिसावी असे वाटत असेल, तर सूर्यफूल हा एक उत्तम पर्याय आहे. हे पिवळ फुल जेव्हा बहरतात तेव्हा सूर्यप्रकाशात एक वेगळीच चमक देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सूर्यफूल ही एक अशी वनस्पती आहे जी लहान जागेतही चांगली वाढू शकते, जर त्याची योग्य काळजी घेतली तर.
तर सुर्यफूलाला तेजस्वी सूर्यप्रकाश आवडतो, परंतु जास्त पाणी देणे किंवा चुकीची माती या फूलाची वाढ खुंटवू शकते. या लेखात आपण तुमच्या बाल्कनीमध्ये सूर्यफूल कसे लावायचे हे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. त्यासोबतच कुंडीत सुर्यफूलाची बी लागवड केल्यानंतर किती सूर्यप्रकाश, पाणी आणि खत आवश्यक आहे आणि सूर्यफूल लावण्यासाठी सर्वोत्तम ऋतू व महिना कोणता ते देखील जाणून घेऊयात.
सूर्यफूल लागवडीसाठी योग्य वेळ
सूर्यफूल लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा हवामान खूप थंड किंवा खूप पावसाळी नसते. वसंत ऋतू म्हणजेच फेब्रुवारी ते मार्च आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस सूर्यफूल बियाणे कुंडीत लावण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात 20 ते 30 ° सेल्सिअस तापमान असते. त्यात सुर्यफूलाची लागवड करणे उत्तम आहे. अत्यंत थंड हवामान असल्यास बियाणे खराब होऊ शकतात आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मुळे कुजू शकतात.
कुंडीत सूर्यफूल कसे लावायचे
तुम्ही जर सूर्यफूल लावत असाल तर किमान 12-16 इंच खोल कुंडी निवडा. तळाशी ड्रेनेज होल असल्याची खात्री करा. आता कुंडीत माती टाकण्यासाठी त्यात 50% बागेची माती, 30% कंपोस्ट आणि 20% वाळू किंवा कोकोपीट असे सर्व एकत्रित करू तयार माती कुंडीत भरा. सूर्यफूलाचे बियाणे कुंडीत 1 इंच खोल दाबा. प्रत्येक कुंडीत फक्त १२ बिया लावा. हलके पाणी शिंपडा.
किती सूर्यप्रकाश आवश्यक आहे?
सूर्यफुलाच्या रोपांना भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यांना दररोज 6 ते 8 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. बाल्कनी अशी असावी जिथे दिवसाचा बहुतेक वेळ सूर्यप्रकाश मिळतो विशेषतः सकाळपासून दुपारपर्यंत. जर कमी सूर्यप्रकाश असेल तर रोप उंच वाढेल पण कमकुवत होईल. फुले देखील लहान किंवा उशिरा येतील. आणखी एक गोष्ट म्हणजे कुंडीत लावलेलं रोपं एका दिशेने झुकण्यापासून रोखण्यासाठी वेळोवेळी कुंडी फिरवा.
रोपाला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती?
सूर्यफुलांच्या रोपाला जास्त पाणी टाकू नका. तसेच कुंडीतली माती पूर्णपणे कोरडी राहणार नाही याची काळजी घ्या. संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे. कुंडीतील वरची माती जेव्हा 1-2 इंच कोरडी वाटेल तेव्हा पाणी द्या. उन्हाळ्यात तुम्हाला दररोज किंवा दर दुसऱ्या दिवशी पाणी द्यावे लागू शकते. हिवाळ्यात पाण्याची गरज कमी भासते. तथापि, लक्षात ठेवा की कुंडीत चांगला निचरा असावा. पाणी साचू देऊ नका, अन्यथा मुळे कुजू शकतात. दररोज पानांना पाणी देण्याची गरज नाही; मुळांना पाणी देणे अधिक महत्वाचे आहे.
खत देण्याची योग्य वेळ आणि पद्धत
सूर्यफूल ही जलद वाढणारं झाड आहे म्हणून त्यांना वेळोवेळी खतांची आवश्यकता असते. बियाणे पेरल्यानंतर 15-20 दिवसांनी पहिल्यांदा हलके खत मातीत मिक्स करा. एकदा रोप वाढू लागले की, दर 20-25 दिवसांनी एकदा खत द्या. खतासाठी तुम्ही कुजलेले शेण, गांडूळखत किंवा घरगुती स्वयंपाकघरातील कंपोस्ट वापरू शकता. लक्षात ठेवा, जेव्हा फुले येण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही फॉस्फरस असलेली सेंद्रिय खते वापरू शकता. फक्त रासायनिक मुक्त खते वापरण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे पानांची वाढ होईल परंतु फुले कमी बहरतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)